माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

मी लिहित गेलो...!!!

मला वाटलं तस तसं,
मी माझं लिहित गेलो..
कुणाला आवडलं अन कुणाला नावडलं,
मी मात्र फक्त मांडत गेलो...


कधी कुणाला बाजूचे वाटले
अन कधी कुणाला विरोधी म्हणून खटकले...
वाद अन विवाद गाजले  तरीही
मी मात्र माझी भूमिका घेत गेलो...


अमुक लिहातमुकच लिहिले नाही,
नाना प्रकारच्या वादात अडकलो...
पादत्राणांच्या प्रसादाच्या धमक्यांना भीक न घालत,
मी शब्दांसोबत लिहीतंच गेलो....


भीतीपर्वा अन काळजी जिवाची,
किती दिवस करायची...
मुर्दाडांच्या मेंदूतील गाभाडलेल्या विचांरांना साक्ष ठेऊन,
मी एका गोळीची जागा राखून ठेवत लिहित गेलो...

गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा