माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७


सरकारी दुर्दशा


खड्ड्याची धडधड वाढली की, 
गावाच्या रस्त्याची चाहूल लागते...
मातीचा गंध येण्याअगोदरंच तुंबलेल्या गटारीचा दुर्गंध,
गावाच्या वेशीचा इशारा देऊन जाते...


पारावरची उनाड पोरं पाहिली की,
हाताला काम नसल्याचे सांगून जाते...
पिचकाऱ्या अन धुराचे लोट दिसले की,
स्वच्छता अभियानाची तत्परता जाणवते...


झेंडे, फ्लेक्स अन जाहिराती पाहिल्या की,
ढोंगीपणाचं अन थापांच पीक जोमात आलेले दिसते...
पण सडलेली पिकं अन ओसाड रानं दिसली की,
शेतकऱ्याचं मरण फासासहीत उभे रहाते....


माझा देश बदलतोय,
पुढारी दिसला की आरोळी अन हाक ऐकायला येते...
अच्छे दिन म्हणून भारताचा इंडिया होतोय,
पण माझ्या भारताची कृषिप्रधान ओळख र्‍हास पावते...

गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा