या वर्षामधील शेवटची कविता....
Dedicate to all Friends who make me good friend than person.....
Thanks for including me in your life
वर्ष येतात आणि जातातही,
वर्षाचा शेवटचा दिवस आला कि, "गेलेलं संपूर्ण वर्ष कसं गेलं...?" याचा हिशोब लावायला सुरुवात होते. गेलेल्या वर्षात खूप काही झालं, खूप काही मिळालं, खूप काही गमावलं...
आता जे कमवलं किंवा जे गमावलं, त्याला "खूप" कसे म्हणता येईल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...
नवीन माणसं भेटली "जीव" बनली, काही "जीव" लावलेली माणसं दुरावली..
काही श्वास भास ठरले आणि काही भास श्वास ठरले....
जे चांगलं होतं, मनापासून हवं होतं आणि ते आयुष्याने आपल्याला मिळवून दिलंय त्याची किंमत ठेवायची, मिळालंय ते जपून ठेवायचं...
"सगळेच नशीबवान नसतात, आपण नशीबवान निघालो" असे म्हणून आयुष्याचे आभार मानून मिळालेलं टिकवून ठेवायचं...
कारणआयुष्य आपल्याला "मिळवून द्यायचं" काम करतं.
ते जपणं आपल्या हातात असतं..
आपण चालायचे थांबतो पण आपण थांबलो म्हणून घड्याळाचे काटे थांबतात का...?
नाही, त्यांची टिकटिक चालूच राहते
"वेळ थांबत नसतो"...
"दु:ख मनाच्या कुपीत बंद करायचं आणि सुखाच्या स्वागतासाठी सज्ज रहायचं"
आज वर्षाचे शेवटचे दोन दिवस राहिलेत.....
खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल, अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली, पण तितकीची जवळ आली, खूप काही सोसलं, खूप
काही अनुभवलं, केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकलं......
धन्यवाद मित्रांनो देत
असलेल्या साथीबद्दल......
असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो.......
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा......
Dedicate to all Friends who make me good friend than person.....
Thanks for including me in your life
!! आयुष्याचं पान !!
आयुष्याचं अजून एक पान पलटलं....
काळाच्या पडद्याआड जाऊन पडलं...
जणू आयुष्य आठवणीत कोंदलं गेलं...
क्षणभरासाठी डोळ्यात टिपे देऊन गेलं...
होतं दुःखानं थोडं चुरगाळून गेलेलं....
पण तरी नव्हतं किंचित ही फाटलेलं...
आनंदाचं अक्षर कुठेमुठे होतं लपलेलं
जणू सुखाच्या रेषेचं अस्तिवच होतं त्यानं जपलेलं...
होतं कोणी त्यावर थोडं अधिक लिहलेलं....
पण कोणीच नव्हतं ते वाचलेलं...
जणू कोणाला वाचताच नव्हतं आलेलं...
कारण आयुष्यात अजून कोणी डोकावून नव्हतं पाहिलं....
होतं मैत्रीचं नातं एका कोपर्यात लिहिलेलं...
प्रत्येक सुख दुःखात साथ दिलेलं..
आठवत होतं कधी पाठीवर आधाराचा हात दिलेलं..
विसरत नव्हतं एकत्र खळखळून हसलेलं....
होतं एका कोपर्यात कवितेवरं प्रेम लिहिलेलं...
छंद आहे की आवड कधीही नाही उमजलेलं...
असावं बहुतेक जुन्या आठवणींचं मनोगत...
शब्दाशब्दातून कागदावर उतरलेलं....
होतं एका कोपर्यात कुटुंबाचं प्रेम लपलेलं...
कधी व्यक्त केलं नाही तरी
कायम सोबत असलेलं...
आयुष्याला प्रेरणा देत असलेलं...
होतं एका कोपर्यात प्रेमाचं फुलपाखरू...
अजूनही फुलाचा शोध घेत असलेलं....
अजूनही वेड्यासारखं फिरत असलेलं...
भेटीच्या ओढीनं वाट बघत हिंडत असलेलं....
होतं एका कोपर्यात खेळावरचंप्रेम लपून राहिलेलं....
क्रिकेट कबड्डी फुटबॉल की कुस्ती....
सगळ्याच खेळत मन होतं अडकलेलं...
धोनीच्या निवृत्तीइतकंच दुःख
मुंबई केरलाच्या हरण्याचंही झालेलं....
होतं एका कोपर्यात
दुःख राजकारणातलं....
जितकं होतं मुंडेच्या अपघाती मृत्यमधलं...
तितकच होत दादांच्या पराभवातलं...
आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसलेलं....
होतं एका कोपर्यात प्रेम गाण्यात उतरलेलं...
मैं तेनु समझावा म्हटलं तरी कधीच न समजलेलं...
प्रत्येक क्षणी नवा आनंद देत असलेलं....
होतं एका कोपर्यात प्रेम त्या मित्रांमधलं....
कॉलेजमधील प्रत्येक क्षणाला जाणीव करून देत असलेलं....
कधी पुन्हा भेटून गप्पा मारू म्हणत असलेलं...
उचकीनंतरही पाणी पिऊन देत नसलेलं...
होतं एका कोपर्यात प्रेम
कोणाच्या तरी आठवणी मधलं....
ह्रदयावर खोल जख्मा करून गेलेलं...
आठवणी विसरण्याची वाट पहात असलेलं...
एक एक कोपरा वाचून काढत....
पान होत संपत आलेलं...
मनातल्या ओलेपणाला
त्यानेही अलगद डोळ्यातून टिपलेलं.....
आयुष्याचं नवीन पान उलटताना
पु लं चं एक वाक्य आठवलं...
आयुष्यात मला भेटलेल्या तुमच्या सारख्या व्यक्तींचं
व्यक्तीपेक्षा वल्लीपणच मला फार आवडलं...
म्हणूनच तुमच्या आभाराचे शाब्दिक प्रेम
लेखनीतून काव्यातून उतरलं....
वर्षाचा शेवटचा दिवस आला कि, "गेलेलं संपूर्ण वर्ष कसं गेलं...?" याचा हिशोब लावायला सुरुवात होते. गेलेल्या वर्षात खूप काही झालं, खूप काही मिळालं, खूप काही गमावलं...
आता जे कमवलं किंवा जे गमावलं, त्याला "खूप" कसे म्हणता येईल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...
नवीन माणसं भेटली "जीव" बनली, काही "जीव" लावलेली माणसं दुरावली..
काही श्वास भास ठरले आणि काही भास श्वास ठरले....
जे चांगलं होतं, मनापासून हवं होतं आणि ते आयुष्याने आपल्याला मिळवून दिलंय त्याची किंमत ठेवायची, मिळालंय ते जपून ठेवायचं...
"सगळेच नशीबवान नसतात, आपण नशीबवान निघालो" असे म्हणून आयुष्याचे आभार मानून मिळालेलं टिकवून ठेवायचं...
कारणआयुष्य आपल्याला "मिळवून द्यायचं" काम करतं.
ते जपणं आपल्या हातात असतं..
आपण चालायचे थांबतो पण आपण थांबलो म्हणून घड्याळाचे काटे थांबतात का...?
नाही, त्यांची टिकटिक चालूच राहते
"वेळ थांबत नसतो"...
"दु:ख मनाच्या कुपीत बंद करायचं आणि सुखाच्या स्वागतासाठी सज्ज रहायचं"
आज वर्षाचे शेवटचे दोन दिवस राहिलेत.....
खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल, अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली, पण तितकीची जवळ आली, खूप काही सोसलं, खूप
काही अनुभवलं, केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकलं......
धन्यवाद मित्रांनो देत
असलेल्या साथीबद्दल......
असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो.......
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा......
गणेश दादा शितोळे
(३१ डिसेंबर २०१४)
(३१ डिसेंबर २०१४)


