माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, १४ एप्रिल, २०१४

आठवणीत तुझ्या या मन बावरले का असे..सांगणार का कधी तू या मना...


आठवणीत तुझ्या या मन बावरले का असे..
सांगणार का कधी तू या मना...
हसरे भास तुझे दिसती मना कसे
सांगणार का कधी तू या मना...
गुंतले मन हे तुझ्या आठवणीत गाठ ही मी सोडवू कशी...
सांगणार का कधी तू या मना...
आठवणीत तुझ्या या मन बावरले का असे..
सांगणार का कधी तू या मना...

चालता चालता आयुष्य हरवले  आठवणीत तुझ्या...
पावले थबकली रमण्यात आठवणीत तुझ्या...
चालता चालता आयुष्य हरवले  आठवणीत तुझ्या...
पावले थबकली रमण्यात आठवणीत तुझ्या...
साद घालती तरी का आठवणी तुझ्या..
सांगणार का कधी तू या मना...
आठवणीत तुझ्या या मन बावरले का असे..
सांगणार का कधी तू या मना...

आठवणी तुझ्या खेळती खेळ ते जूनी..
थांबवले मी तरी नयनी येते पाणी...
आठवणी तुझ्या खेळती खेळ ते जूनी..
थांबवले मी तरी नयनी येते पाणी...
सावरू किती या मना मी क्षणोक्षणी...
सांगणार का कधी तू या मना...
आठवणीत तुझ्या या मन बावरले का असे..
सांगणार का कधी तू या मना...


गणेश दादा शितोळे
(१४ मार्च २०१४)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा