माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, ४ मार्च, २०१४


ओळखीचं माणूसही परकं




इतक्या दिवस मन ज्या गोष्टीची वाट बघत होतं
आता त्या गोष्टीचा विट आल्यासारखं वाटत असतं
ज्याच्याकडून काही अपेक्षीत नसतं
त्याच्याकडूनच अनपेक्षित उत्तर येतं असतं

आज ओळखीचं माणूसही परकं भासत होतं
जणू कधी आपलं असल्याच जाणवून परकं वाटलं होतं
तर कधी अनोळखी माणूसही आपलसं झालं होतं
जणू कोणी परकं असूनही आपलं वाटलं होतं

ज्याच्यासाठी आपली टिपे गळतात
त्याला त्याची महत्व नसतं
अन ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं
आपलं हास्य किंमती वाटतं असतं

कधी जन्मभर आपली साथ देऊनही
आपल्याला माणसला समजून घेता येता नसतं
तर कधी एका क्षणातच अनोळखी माणूसही
आपल्याला ओळख दाखवत असतं...



गणेश दादा शितोळे
(०४ मार्च २०१४)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा