माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

गुरुवार, २ जानेवारी, २०१४

From New Year I Started My New book of poetry म्हणून मला आयुष्यामधून कोणी गेलं म्हणून आयुष्य थांबवून ठेवायचं नव्हतं...................

कवितेचं पहिलं पान...................




म्हणून मला आयुष्यामधून कोणी गेलं म्हणून

आयुष्य थांबवून ठेवायचं नव्हतं...................





जगायचा होता प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लांबवून ठेवायचं नव्हतं
आठवणीच्या वाटावरून स्वप्नांपर्यंत पोहचायचं होतं
आभाळापर्यंत कोणालाच पोहचायता येत नसलं तरी
आभाळालाच खाली खेचायचं होतं
म्हणून मला आयुष्यामधून कोणी गेलं म्हणून
आयुष्य थांबवून ठेवायचं नव्हतं...................

मैत्रीच्या व्याख्या आज बदलेल्या असतील म्हणू
मित्रांना बदलायचं नव्हतं
आज असेल कदाचित मी एकटा पण
एकटेपणाशीच मैत्री निभावत जगायचं होतं
ते विसरत चालले म्हणून आपण त्यांना विसरायचं नव्हतं
त्यांना गरज होती कधी काळी म्हणून
मैत्री होते असं मैत्रीचं नातं नसतं
म्हणून मला आयुष्यामधून कोणी गेलं म्हणून
आयुष्य थांबवून ठेवायचं नव्हतं...................

मैत्रीचं नातं गरजांवर नाही तर विश्वासावर टिकतं
त्यांना आपल्यावर विश्वास नसेल म्हणून
मला तसं अविश्वासूपण दाखवायचा नव्हतं
आज दूर चालत गेले असले तरी
कधी सोबत होते म्हणत जगायचं होतं
हे गेले म्हणजे नशीब याहून चांगले मित्र देत असतं
म्हणून मला आयुष्यामधून कोणी गेलं म्हणून
आयुष्य थांबवून ठेवायचं नव्हतं...................

कदाचित नशीबात हेच परत मिळावेत असं नेहमीच नसतं
हेच मित्र कायम सोबत असावेत असं
प्रत्येकासारखंचं माझंही म्हणणं होतं
काहींचं स्वप्न सत्यात उतरतं तर काहींचं स्वप्नचं ठरतं
भेटतील आयुष्याच्या प्रवासात कधी म्हणत
त्यांना आठवणीत ठेवायचं होतं
म्हणून मला आयुष्यामधून कोणी गेलं म्हणून
आयुष्य थांबवून ठेवायचं नव्हतं...................
म्हणून मला आयुष्यामधून कोणी गेलं म्हणून
आयुष्य थांबवून ठेवायचं नव्हतं...................






गणेश दादा शितोळे
(०२ जानेवारी २०१४)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा