माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, १८ जानेवारी, २०१४

आज पहाटे लिहिलेली कविता.(व्हिच आय मोस्ट लाईक.)





सक्सेस म्हणजे तरी नक्की काय असतं...




सक्सेस म्हणजे तरी नक्की काय असतं
अपेक्षित गोष्ट वेळेत पूर्ण होणे म्हणजेच यश असतं
म्हणून कोणाचं यश अपयश आपण ठरवायचं नसतं
आयुष्यात कायम अपयशच मिळवायचं असतं

अपयशच कायम यशाकडे जायची फर्स्ट स्टेप असतं
थोड्याशा यशानं हुरळून जायचं नसतं
अपयश आलं कधी तरी खचायचं नसतं
आपण फक्त प्रयत्न करत रहायचं असतं
कधी ना कधी यश मिळणार हे ठरलेलंच असतं


गणेश दादा शितोळे
(१८ जानेवारी २०१४)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा