माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, १३ जून, २०१४

तू एकदा तरी पुन्हा पहिल्या सारखे बोलावं.......


मैत्रीमधे एकाचवेळी सायलेंट व्हायचं नसतं.....
एकानं बोलायचं तर दुसर्‍याने ऐकायचं असतं.....
मैत्रीमधे संवादाचं काम कायम ठेवायचं असतं....
नात्यातला संवाद संपला की नातं संपत जात असतं.....

मैत्रीमधे फक्त समजून घ्यायचं असतं.....
नातं फिल करण्यात आनंद आणि दुःख असतं.....
मैत्रीमधे एकमेकांना फिल करायचं असतं....
म्हणूनच मैत्रीचं नातं आयुष्यभर टिकत असतं.....

मैत्री मधे सॉरी आणि थँक्यू असं काहीच नसतं.....
पण त्याशिवाय कोणतंच नातं टिकत नसतं.....
मित्र चुकला तर त्याला ‘गलत का सही’ करायचं असतं......

अबोला असताना मनवण्याइतकं
अवघड काहीच नसतं.....
तू कायम माझ्याशी बोलावं असं नेहमी वाटतं.....
मी चूकतो तरी तू सावरते माझ्या लक्षात आलं होतं....
मै जिंदगी का साथ निभाता रहूंगा म्हणत जगायचं होत....

आयुष्यात प्रत्येकाकडूनच
काहीना काहीतरी चुकत असतं......
आपल्या माणसाच्या चुकांना
आपणच माफ करायचं असतं.....

रूठलेल्या मनाला मनवायचं असतं....
प्रेम वाढतं म्हणून फक्त भांडायचं असतं.....
 खोटं भांडता भांडतानाही
एकमेकांच्या मनाला जपायचं असतं.....

गणेश दादा शितोळे
(१३ जून २०१४)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा