माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, १० मार्च, २०१४


आयुष्य....!!!





आयुष्य कोणत्या वाटेने जाईल कोणालाच कळत नसतं
आपण कितीही ठरवलं तरी आयुष्य त्याच वाटेनं जात असतं
वेड्या वाटा कोठून कशा वळतील सांगता येत नसतं
सरळ असू की वाकडी आयुष्य त्याच वाटेनं जागवं लागतं

कधी एकाकी आयुष्य हाती ठेवुन
वाटांनी पळणं सुरू केलेलं असतं
तर कधी आठवांना हाती सोडून
आयुष्य आपल्या वाटेनं पळत असतं

आयुष्याच्या सुंदर वाटेचं स्वप्न मीही पाहिलं होतं
कोणी सोबत असताना आयुष्य सुंदर वाटत होतं
आयुष्य कधी वळण घेईल माहित नव्हतं
स्वप्नपूर्ती करणाऱ्‍या वाटेला आयुष्यानं मधेच वळण घेत बदललं होतं

त्या वळणावर आसवांना रडायला आलं होतं
दुःखाच्या काळोखात स्वप्न गळून पडलं होतं
दुनिया तर गोल आहे प्रत्येकालाच वाटत होतं
पण कितीही गोल फिरलं वाटेवर परत जाता येत नव्हतं

याच वळणावर कोणी मला सोडून जायचं ठरवलं होतं
त्यांच्या वाचून आयुष्य माझं मलाच छळत होतं
त्याच वाटेवर मैत्रीच्या प्रवासाला सुरू केलं होतं
त्याच वाटेवरच्या वळणावर मैत्रप्रेम संपलं होतं...




गणेश दादा शितोळे
(१० मार्च २०१४)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा