माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, ८ मार्च, २०१४


फेसबुक....!!!




प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
आपलंही काहीतरी स्टेटस टाकावसं वाटत असतं
किती कमेंट्स लाईक्स मिळतात यापेक्षा काही सांगावं वाटत असतं
समोरच्याला फालतू वाटलं तरी काही शेअर करावं वाटत असतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
रोज न चुकता कायम ऑनलाईन राहावं वाटत असतं
सतत कोणाबरोबर चॅटींगला बसावं वाटत असतं
समक्ष भेटून न बोलणाऱ्‍यालाही इथं मात्र
ऑनलाईन हाऊ आर यु विचारावं वाटत असतं
समोरच्याच्या जीवनात काय चाललंय जाणून घ्यायचं असतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
आपलंही रिलेशन स्टेटस सिंगलपासून कमिटेडमधे बदलावं वाटत असतं
त्यासाठीच एखाद्या ग्रुपला जॉईन करावं वाटत असतं
समोरच्याने इंचभर जागा दिली की तशी कोसभर वाढवावी वाटत असतं
फेसबुकचाही वापर कोणी मॅट्रीमोनी साईटसारखा करत असतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
समोरच्याला चांगलं वाटणारं प्रोफाईल भरलं जात असतं
त्यातलं खरं किती खोटं किती प्रत्येकालाच माहित असतं
प्रत्येकजण उगाच स्वतःला अतिसभ्य दाखवायचा प्रयत्न करत असतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
आपलंही काही सिक्रेट उघडकीस केलं जात असतं
बोभाटा झाला की प्रायव्हसी जपत नसल्याचा दोष फेसबुकलाच देत असतं
आपण काय अपलोड करावं कळून येत नसतं
मात्र आपल्या चूकीचं खापर फेसबुकवरच फोडलं जात असतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
आपण कुठे फिरलो हिंडलो सगळ्यांना सांगायचं असतं
प्रत्येक ठिकाणचे स्वतःचे फोटो शेअर करायचं असतं
जणू स्वतः त्याठिकाणी गेले होते हेच प्रुव करायचं असतं
स्वतःच्या फोटोपेक्षा तिथलं सौंदर्य अधिक सुंदर असल्याचंच विसरायला होतं
फोटोंशिवायही फिरणं असतं हेच त्यांना माहित नसतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
इथं वास्तवात जगण्यापेक्षा ऑनलाईन जगण्यालाच महत्व असतं
भेटून बोलून नाती जपण्यापेक्षा ऑनलाईन नाती टिकवण्यालाच महत्व वाटत असतं
फेसबुक किप इन टच ठेवत नात्यातला ओलावा कमी करत असतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
प्रोफाईल फोटोच्या नावाखाली वास्तवातल्या चेहऱ्‍याला लपवलं जात असतं
फेसबुक नावाप्रमाणेच फेस बघूनच नाती जपायला शिकवत असतं
कितीही लिहलं कितीही वाटत असलं तरी
फेसबुकच महत्व प्रत्येकाला जाणवत असतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
फेसबुक चांगलं किती वाईट किती काहीच कळत नसतं
कोण म्हणतं फेसबुक प्रत्येकाला किप इन टच ठेवत असतं
पण नात्यातला खरा ओलावा कमी करत असतं
कोणी काही म्हटलं तरी हे खरंच असतं
वास्तवातल्या नात्यापेक्षा ऑनलाईनच नातं घट्ट बनत असतं




गणेश दादा शितोळे
(०८ मार्च २०१४)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा