माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, १४ मार्च, २०१४


आयुष्य.....!!!



माणसाच जीवन किती इंटरेस्टींग असतं
आयुष्य क्षणाक्षणात विखुरलेलं असतं
क्षणात काही घडत बिघडत असतं
आयुष्यही बदललं जात असतं

एका क्षणात कोणाचं मन तुटत असतं
मनाला जोडणारं दोरंखंड सुटत असतं
विश्वासाचं नातं संपत असतं
क्षणात होत्याचं नव्हतं होत असतं

एका क्षणात कोणी भेटत असतं
पुढच्या क्षणात नात जुळत असतं
नात जोडता जोडता मन गुंतत असतं
क्षणात माणसाच्या जीवनात कोणी येत असतं

आयुष्यात प्रत्येकावर काहीतरी ऋण असतं
ऋणांखाली प्रत्येकाचं आयुष्य दबलेलं असतं
म्हणून प्रत्येकावर काहीतरी बंधन असतं
त्या बंधनांतच आपल्याला जगायचं असतं...



गणेश दादा शितोळे
(१४ मार्च २०१४)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा