माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, २९ डिसेंबर, २०१४


कालच्या दिवसाकरता सुचलेली कविता.....

एका लग्नात....



होते एक लग्न जेव्हा....
आम्ही मित्र एकत्र भेटलो होतो....
विसरून कामाचे टेन्शन सारे....
बिझी शेड्युलचा वेळ काढून आलो होतो...

सातासमुद्रपारचे मित्र भेटले....
जणू असाच कल्लोळ झाला होता....
असे गप्पांच्या ओघात रिंगण झाले होते....
जणू पुन्हा एकदा कट्ट्यावरच बसलो होतो....

आले सगळेच एकमेकांना भेटायशी....
जणू हसून भेटली विखूरलेली मने....
येताच सुर्य नभशीरावरी....
हळूच गेले सावलीमधे....

अचानक नाद असा तो घुमू लागला...
क्षणात पायंचा ठेका थिरकू लागला...
मित्र आमुचा ऐसा नाचला...
जणू प्रभूदेवाही त्याच्याकडूनही शिकला असता...

बेबंध तालांनी नाद तो गुणगुणला...
मित्रांचा मेळा येथेच्छ डुंबून गेला...
नृत्याचा आविष्कार ऐसा होता...
पहाणारा नकळत खळखळून हसून गेला...

वेळ झाली तिथी समीप आली...
नवजोडप्या अगोदर भटजींनाच घाई झाली....
पावालांची वाट मंडपापर्यंत पोहचली....
आक्षताही हातोहाती विसावली...

पहिली सावधान घटका झाली...
अक्षताच्या पावसाचा सडा तोंडावर सडकून पडला...
जणू अक्षता युद्धाचा खेळ सुरू झाला....

तोंडाच्या झडपा झाकल्या परी..
डोक्यावरचा सडा नाही थांबला....
दाराखिडकीत चोरून बसला...
तरी मागूनही अक्षतांचा मारा न चुकला...

लग्न लागले बाहेर पडले....
तरी सगळ्यांनी मनी ठरवले...
अक्षतांचा खेळ ही शेवटी...
मित्राच्या तोंडावर मारूनच संपला...

जेवणाच्या पंगतीतही उठल्या...
खिशातल्या नोटा आहेराच्या पाकीटात विसावल्या....
नाव टाकण्याच्या बहाण्यात...
गर्लफ्रेंडच्या आठवणी जाग्या केल्या....

एकाकी फिरणारा मित्र आमुचा...
वहिनींसोबत दिसू लागला...
घुमघुमत्या आवाजाने
प्रत्येक हाका देऊ लागला...

जोडीनेच मग ओळखीचा कार्यक्रमही उरकला....
एका फोटोसाठी भटजी मधेच थांबवला....
मित्रांचा मेळा त्याला तारखेचे विचारू लागला...
जणू पुन्हा भेटण्याचा प्लान रेडीच केला....

निरोपाच्या गाड्या प्रत्येकाने बाहेर काढल्या...
तरी कोणाला जावेसे मात्र आठवेना...
मग नकळत उद्या डोळ्यासमोरी झाला. ..
शेवटच्या निरोपाला प्रत्येक जण घाई करू लागला....

भेटून झाले...
हसून झाले...
शेवटच्या क्लिक ला पुन्हा सगळे एकत्र आले...
पुन्हा भेटण्याच्या साक्षीने सगळे निघायला झाले....

सुर्य ही किरणात विखरून गेला...
प्रत्येक जण किरणाच्या प्रकाशात निघून गेला. ..
सुर्याला पुन्हा नव्याने भेटण्याच्या साक्षीने,
रस्ता ही स्वतःच्या प्रवासात मार्गस्थ झाला...

गप्पांच्या ओघात सारा...
तो दिवसच कसा निघून गेला...
मनी मनी हे कळले नाही...
पुन्हा एकदा भेटणार कधी......




गणेश दादा शितोळे
(२९ डिसेंबर २०१४)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा