माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

चिरंजीवचा श्री होतोएस तू...

कोणासाठी सागर होता तू,
कोण तुला भग्या म्हणायचं,
तर कोणसाठी इंद्राचंद्रा होता तू...
आता चिरंजीवचा श्री होणार आहे तू...

आयुष्याची काही वर्षे एकटा जगला तू,
मित्रांच्या गर्दीत रमून गेला तू...
भेटली आहेत तुला अनेक हक्काची माणसं,
आता बोहल्यावर चढत आहेस तू...

मैत्री असू की अजून बरंच काही,
आजवर प्रत्येक नाती निभावत आलायस तू...
याच प्रत्येक नात्याचा अनुभव आहे पाठीशी,
आयुष्यात एका नव्या नात्यात प्रवेश करतोस तू...

आजवर जिथं कमी तिथं आम्ही म्हणत,
कित्येकांच्या पाठीशी उभा राहिला तू...
काळजी घे आता दोघांसह घरच्यांची,
आता दोन जीवांचा होतोएस तू...


आयुष्यात अनेकांना दिले आनंदाचे क्षण तू,
अजून एक आनंदाचा क्षण देतोएस तू...
वहिनींना अन तुला मित्र परिवाराच्या शुभेच्छा,
आता चिरंजीवचा श्री होतोएस तू...



आमचा जीवाभावाचा मित्र सागर (दादा) आज आयुष्याच्या नवीन नात्यात प्रवेश करतोए,
अमृताच्या साथीने त्याच्या आयुष्यात अमृताहून गोड क्षण यावेत हीच सदिच्छा.

मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा हा लग्नसोहळा जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो तेवढा कोणताही दिवस वाटत नाही.  अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून अंतरंग आनंदाने भरून जावे.

विवाहसोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा...!


(सागरसह आम्ही मित्र परिवार. डावीकडून गणेश शितोळे, नंदकिशोर मोरे, राहुल गिऱ्हे, स्वप्निल कोकाटे, सागर भगत, संतोष गाढवे, बाळासाहेब खाडे आणि महेश आडेप.)






गणेश दादा शितोळे
(०८ डिसेंबर २०१५)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा