माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५


आमच्या भविष्याची, भवितव्याची चिंता...



                          महाराष्ट्रात जरी दुष्काळ पडला असला तरी सध्या आमच्या भविष्याची, भवितव्याची चिंता करणारांचा सुकाळ पडला आहे. आम्ही म्हणजे त्यांच्या भाषेत "वाया गेललो". कारण काय तर एकत्र मित्रांसोबत खेळतो. एकत्र हिंडतो अन पार्टनर पार्टनर फिरत असतो.
सतत व्हाट्सअप फेसबुक सोशल नेटवर्किंग साइट्स वर ऑनलाईन असतो. 

                          हो असतो आम्ही कायम एकत्र. पण आम्हाचा वेळ घालवण्यासाठी.
एकत्र येतो आम्ही खेळण्यासाठी. रोज तेवढा खेळत हिंडत बागडत कसा जातो कळत नाही म्हणून 
आम्ही एकत्र असतो.
आहे आवड. आहे छंद. यांच्या भाषेत "वाया गेलेलो" तर नक्कीच नाहीत आम्ही.

                          खेळ कोणत्याही प्रकारचा असो. तो विरंगुळा म्हणून खेळायचा असतो आणि निदान आम्ही तरी तो तसाच खेळतो. खेळ कोणताही असो. आम्ही तो खेळणार. कारण आमचं ब्रीदवाक्य आहे.  "जिथं कमी तिथं आम्ही".  या खेळात कधी सोबत कधी बरोबर तर कधी विरोधात बसून सगळे खेळतात आणि खेळले. पण टोमणे मारायचे धंदे आम्ही केले नाहीत.  आमच्या भवितव्याची काळजी करत टोमणे मारा खुशाल. आम्हाला त्याची फिकीर मुळीच नाही.

                          हो कारण निदान वयाने मोठे आहात म्हणून म्हणा आम्ही अजूनही आदराने बोलतो. तुमच्या खोचक बोलण्याला चेष्टेने घेतो. पण आमचे शब्द षंड झाले नाहीत हेही लक्षात घ्या. कधी वार करून जातील डोळ्याचं कानालाही कळायचं नाही. लग्न झालं, मुलं झाली अन रोजच रूटीन लाईफ सुरू झालं म्हणजे आयुष्य ही तुमची व्याख्या असेल कदाचित. आमची नाही. 

                          आयुष्य आनंदात जगायचं. वेळ असेल तसं आयुष्य एन्जॉय करायचं. आम्हाला आता वेळ आहे म्हणून आम्ही खेळतो. हे वय आहे खेळायचं. दोन वर्षांनंतर तुम्ही खेळायला बोलावलं तरी आम्हाला वेळ असेलच याची खात्री नाही. आयुष्य प्रत्येक वेळी प्रत्येक वळणावर बदलत जाते अन प्रत्येकाला त्या त्या फेजमधून जावं लागतंच. आमची तत्व आम्हाला मान्य आहेत. बाकी कोणाला काय वाटते याचे काळजी कशाला. 
ना देवाला मानतो. 
न धर्माला मानतो. 
आम्ही फक्त
आमच्या तत्वांना मानतो.

लबाडीने जिंकण्यापेक्षा, 
तत्वाने हारलेले बरे.

कारण कोणी 
विचारलेच की
"हरला कसा?" 
तर गर्वाने सांगता
 येते की
 "मी लढलो कसा"

आणि आम्ही ही आयुष्याची लढाई आमच्या तत्वांनी अन तत्वज्ञानाने लढतोय..
ना जिंकण्याची चिंता आहे ना हरण्याची भिती...
तो पर्यंत हा खेळ सुरूच...

ना विचार झालेत आमचे बोथट,
ना शब्द झालेत आमचे षंड...
कधीही आव्हान द्या रणांगणात उभे राहू,
थोपटून पुन्हा एकदा तेच मर्दानी दंड...


गणेशदादा शितोळे
(१३ नोव्हेंबर २०१५)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा