माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५


शुभेच्छा...



लिहायचं बरंच असतं...
पण प्रत्येक वेळी काहीतरी राहून जातं...
राहिलं की राहून जात असतं...
म्हणून पुन्हा थोडं लिहिवसं वाटत होतं...


शुभेच्छा तर दोन शब्दात द्यायला आलं असतं...
पण जुन्या आठवणीत लिहिलं जात होतं...
मिळाला उजाळा काही क्षणांना तर,
शब्दही दुसर्‍याला आनंद देत असतं...


जाऊद्या शुभेच्छा द्यायचं तर फक्त निमित्त होतं...
बर्‍याच दिवसांनी लिहायला कारण हवं होतं...
आणि तसंही लेखकाचं हेच वैशिष्टय़ असतं...
की कितीही लिहिलं तरी त्याला कमी वाटत असतं...



गणेश दादा शितोळे 
(१८ नोव्हेंबर २०१५)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा