टि. व्ही बघणे, लैपटॉप, फेसबूक ह्या कक्षा
मनाला कायमंच फार अरूंद वाटू लागल्यात...
त्यापलीकडचं जग खुणवू लागलं अन
चार भिंतीच्या साम्राज्यातली घुसमट चिथऊ लागलीए...
श्वासासोबत मनात
प्रलयकारी प्रश्नांची सरबत्ती होऊ लागते
अन मग श्वासांनाही
ते प्रश्न झेलणे अवघड होऊन जाते...
असं कितीही असलं तरी
मी मात्र काहीच बोलणार नाही....
मन आतूर झालं की वाटत रहातं,
कुणाला तरी सांगावं काहीतरी....
मनातून ते सर्वकाही बाहेर यायचा प्रयत्न करतंय
पण मीच आता ते निघू देत नाही...
अशाने डोह साचलाय मनातल्या मनातच...
भीती वाटत होती म्हणून त्यातलं काही लिहीयला
घेतलं तर
मीच माझ्या प्रश्नाचं उत्तर लिहून ठेवलं...
" नको, आज नको, नंतर बघू."
कारण आता अगणित अनुत्तरीत प्रश्नांची
उत्तर लिहायला खूप उशीर झालाय....
त्यानंतरच्या कितीतरी वेळ मन केवळ नि:शब्दच,
भावनांच्या ओलाव्यात कुठलाही संवाद नव्हता
अन त्याची गरजही भासली नाही....
काही समज गैरसमज असले तर
खुलेपणाने सोप्या भाषेत मांडायचे...
अन तशाच काही लक्ष्मणरेषा आखून घेतल्या की
त्याही ओलांडायच्या नाहीत तर पाळायच्याच....
बस्सं एवढं ठरले की
आयुष्यं कसं व्यवस्थित सुरू होतं...
गणेश सुवर्णा तुकाराम
१८ नोव्हेंबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा