माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, ६ डिसेंबर, २०१५

एक होती अशीही मैत्रीण....


एक होती अशीही मैत्रीण
बरीचशी हट्टी अन किंचतशी लहरी...
बोलताना वाटायची फटकळ अन नव्हती लाजरी...

दिली तिने एकदा माझ्या कवितेला कमेंट...
ओळखलं होतं तिने कविता कोणासाठी परफेक्ट...

मित्र म्हणाला होईल सगळा भांडाफोड गप कर तिला...
दे अशी कमेंट की बोलताच येणार नाही काही तिला...

मित्राच्या आग्रहावरून दिला तिला कडक रिप्लाय..
वाचून तिने डायरेक्ट केलं बरं म्हणून बाय...

माझ्या कमेंट्स वाचून बिचारीच्या दुखावल्या भावना...
होता तो फक्त टाईमपास तिला काही कळेना...

टाईम पास टाईमपास मधे झाली ती नाराज
अन अचानक थांबला तिचा कमेंट्समधला आवाज

कमेंट्स द्यायला लावणारा मित्र झाला नामा निराळा..
मला म्हणाला तूच समजंव हिला बाळा...

आता कसं सांगणार तिला मला असं काहीच बोलायचं नव्हतं...
आता कसं कळणार तिला मित्रांची यारी निभावताना करावं लागतं..

समजवायला बोलता येत नव्हतं शब्दात...
पण वस्तूस्थितील वास्तव उतरत होतं सगळं काव्यात....


गणेश दादा शितोळे 
( ०६ डिसेंबर २०१५ )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा