काल रात्रीच्या पावसात भिजता भिजता बाईक चालवताना सुचलेली एक कविता...
हिशोब आयुष्याचा....
बसलो होतो एकदा आयुष्याचा हिशोब करायला
सुखदुःखाचा ताळमेळ लागतोय का बघायला...
सुरवात केली मी आयष्याचं पान पलटायला...
आयुष्यातल्या वळणावर बाकी काय राहिलं बघायला....
करत होतो फक्त सुखाची बेरीज
अन दुखःची वजाबाकी...
सुंदर क्षणांचा करून करून गुणाकार भागाकार
वाटत होतं आयुष्यात येईल शुन्य बाकी...
आठवले काही मग मित्र अन
जोपसलेले त्यांच्यासोबतचे छंद...
आठवून जूनं सगळं नव्यानं
मिळाला फक्त निखळ आनंद...
जून्या आठवणीत रमत हिशोब झाला मंद...
हिशोब करता करता वाटलं
आयुष्याच्या पहिल्या वळणावर केलं सर्व काही...
क्षणांची आकडेमोड करता करता लक्षात आलं...
आपण थोडसं जगलो राहून गेलं बरंच काही...
गणेश दादा शितोळे
(९ डिसेंबर २०१५)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा