माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५



नात्यांच्या गाठी...!


 जन्माजन्मांतरीच्या गाठी जुळल्या आपल्या,
आज कुठे सैल भासू लागल्या...
विश्वासाच्या कोमल धाग्याने गुंफलेल्या,
आज उलगडून सुटू लागल्या...

दिवस सरले काळचे घड्याळ पळाले,
रोजच्या भेटीही आता विरळ झाल्या...
करिअरने गुरफटून गेलो इतके,
हक्काच्या वेळाही आज निघून  गेल्या...

स्वभावाचे रंगही बदलून जणू,
जुन्या रंगाच्या छटाच नाहीशा झाल्या..
भासे आज आयुष्याचे चित्रच वेगळे,
जणू चित्रातल्या आपल्या जागाही भरून गेल्या...

दोष तो भला कुणाचा,
नात्यांच्याच गाठी आसूड होत्या बांधल्या...
विरहाच्या एका हिसक्यातच,
जन्मोजन्मीच्या गाठी क्षणात सुटून गेल्या...




गणेश दादा शितोळे
(८ डिसेंबर २०१५)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा