मनाचीच सेन्सॉरबाजी
प्रचंड विरोधानंतरही नुकताच बाजीराव मस्तानी प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनीही दणदणीत प्रतिसाद देत प्रत्येक शो हाऊस करत विरोध करणारांना सणसणीत चपराक दिली आहे. पुण्यात काल भाजपच्या काही चमच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे शो बंद पाडण्यासाठी निदर्शने केली. वास्तविक यांची निदर्शने म्हणजे केवळ नौटंकी होती.
यातील काही महाभागांना पत्रकारांनी प्रश्न विचारले,
"पहिले बाजीराव कोण होते.?"
उत्तर:-ते एक मोठे लढवय्ये होते...
"पेशवाईची स्थापना कोणी केली...?"
उत्तर :- एवढं जूनं आठवतं का.?
"सदाशिव भाऊ कोण होते..?"
उत्तर :- सदाशिवराव पेशव्यांच्या घरातले असतील कुणीतरी...!
"पानिपतची लढाई कधी झाली..?"
उत्तर:-1680...
(पानीपत कुठंय हेतरी माहित आहे का हाच प्रश्न आहे...
नशीब पुढचा प्रश्न विचारला नाही, पानिपतची लढाई कोणात झाली होती...?
महाभागांनी उत्तर दिले असते. छत्रपती बाजीराव पेशवे अन औरंगजेब...)
एकाने तर प्रश्न विचारण्या अगोदरच सांगितले...
"काय साहेब, एवढा इतिहास माहित असता तर इथं असतो का.?"
असं म्हणून हे कार्यकर्ते पुन्हा निदर्शने करायला लागली.
"छत्रपती बाजीराव पेशवे यांचा विजय असो. "
यावरून मुख्य म्हणजे हा प्रश्न उभा राहतो की
"बाजीराव पेशवे छत्रपती कधी झाले..?"
बाजीराव पेशवे छत्रपतींच्या स्वराज्यातील चाकर पेशवा म्हणून कार्यरत होते.
बाजीराव मस्तानी चित्रपटात देखील हाच डायलॉग आहे.
"मैं छत्रपती शाहू का नौकर हूँ..."
दुसरं असं या कार्यकर्त्यांनी आंदोलने निदर्शने केली पण मुळात यांना इतिहास माहित नाही तर हे कशाच्या आधारावर निदर्शने करतात..?
मुळात पेशवे कधीच स्वतःला छत्रपती म्हणवून घेत नव्हते.
तर ते छत्रपती या तख्थाचे नोकर समजत होते.
असे असताना बाजीराव पेशवे यांना छत्रपती म्हणून संबोधून एक प्रकारे पुन्हा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
पेशव्यांना छत्रपती करून एक प्रकारे चूकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतोय हेही समजून घ्या....
यांना बाजीराव पेशवे कोण होते माहिती नाही अन हे बाजीराव मस्तानी चित्रपटाविरोधात बोंबलत आंदोलने करत आहेत हाच विनोद आहे.
प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देऊन या अशांच्या मुसकाडात मारली आहे...
एकदा बाजीराव मस्तानी चित्रपट बघा..
मग मत बनवा...
इतिहास समजून घ्या.
उगाच उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रयत्न करू नका.
गणेश दादा शितोळे
(१९ डिसेंबर २०१५)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा