एवढंच सांगणं आहे फडणवीस सरकारला...
बास झाले आता लोकांचे हारे तुरे घ्यायचं...
बास करा आता लोकांच्या लग्न उद्घाटनाला जायचं...
बस करा मागच्या सरकारनं काय केलं सांगायचं...
अन बस करा तुमचं नवरा बायकोसारखं भांडायचं...
कधी सुरू होणार तुमच्या मोदी सरकारचे अच्छे दिन...
भारत सोडून जग हिंडण्यातच रमतंय त्यांच मन...
मागच्या सरकारने पंधरा वर्षे लुटलं म्हणता ना...
मग शंभर दिवस उलटले हार तुरे घेण्यात. ..
आता सुरू करा काम लावून तन मन धन....
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोड़ी थोड़ी प्रगति करा.
खुप संकटे येतील आडवी.
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
जर तुम्हाला तुमची प्रगती मोजायची असेल तर
शंभर दिवस वर्ष असे मोजू नका !
शेतकरी वर्गाच्या डोळयांत आलेले
दोन अश्रू पुसायला किती दिवस लागणार ते मोजा.!!!
गणेश दादा शितोळे
(०२ डिसेंबर २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा