अशी माणसं भेटती पुन्हा...!
अशी माणसं भेटती पुन्हा,
घेऊनी गुज आठवणीचे...
सुखावून जाती मनाला,
देऊनी क्षण आनंदाचे...
ओढ ती की उत्सुकता वेडी,
खेचून आणती बंध नात्याचे...
गुंफले होते बंधच जणू असे,
जुळले होते सुर मनाचे...
पाहूनी मग अर्ध्या तपानंतर,
फुलले चेहरे स्मितहास्याचे...
भारावले डोळे घेऊन कवेत,
हर्षाने बदलले रंगही आसवांचे...
बोलावे की ऐकावे तेच जुने,
दिवस मंतरलेल्या आठवणींचे...
घेती निरोप उद्याच्या स्वप्नांनी,
आभार आहेत शब्द उधारीच्या भेटीचे...
घेऊनी गुज आठवणीचे...
सुखावून जाती मनाला,
देऊनी क्षण आनंदाचे...
खेचून आणती बंध नात्याचे...
गुंफले होते बंधच जणू असे,
जुळले होते सुर मनाचे...
पाहूनी मग अर्ध्या तपानंतर,
फुलले चेहरे स्मितहास्याचे...
भारावले डोळे घेऊन कवेत,
हर्षाने बदलले रंगही आसवांचे...
बोलावे की ऐकावे तेच जुने,
दिवस मंतरलेल्या आठवणींचे...
घेती निरोप उद्याच्या स्वप्नांनी,
आभार आहेत शब्द उधारीच्या भेटीचे...
गणेश दादा शितोळे
(१५ डिसेंबर २०१५)
(१५ डिसेंबर २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा