माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५



अशी माणसं भेटती पुन्हा...!


 अशी माणसं भेटती पुन्हा,
घेऊनी गुज आठवणीचे...
सुखावून जाती मनाला,
देऊनी क्षण आनंदाचे...


ओढ ती की उत्सुकता वेडी,
खेचून आणती बंध नात्याचे...
गुंफले होते बंधच जणू असे,
जुळले होते सुर मनाचे...

पाहूनी मग अर्ध्या तपानंतर,
फुलले चेहरे  स्मितहास्याचे...
भारावले डोळे घेऊन कवेत,
हर्षाने बदलले रंगही आसवांचे...

बोलावे की ऐकावे तेच जुने,
दिवस मंतरलेल्या आठवणींचे...
घेती निरोप उद्याच्या स्वप्नांनी,
आभार आहेत शब्द उधारीच्या भेटीचे...






गणेश दादा शितोळे
(१५ डिसेंबर २०१५)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा