माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, ३ डिसेंबर, २०१६


आम्ही कधी म्हणालो नव्हतो की



आम्ही कधी म्हणालो नव्हतो की
तुम्ही कायम माझ्याशीच बोलत बसावं...!!
फक्त कधी दोन शब्द बोलावेसे  वाटले तर
कोणी हक्कचं असावं इतकीच अपेक्षा होती...!!


आम्ही कधी म्हणालो नव्हतो की
तुम्ही कायम माझंच ऐकून घ्यावं...!!
फक्त कधी मन मोकळं करावसं वाटलं तर
कोणी हक्कचं असावं इतकीच अपेक्षा होती...!!


आम्ही कधी म्हणालो नव्हतो की
तुम्ही माझ्या शब्दाला किंमत द्या...!!
फक्त हाक दिलीच कधी तर
ओह द्यावी इतकीच अपेक्षा होती...!!


आम्ही कधी म्हणालो नव्हतो की
तुम्ही कायम सोबतच रहा...!!
फक्त पाठीमागं वळून बघितलं तर
कोणी हक्काचं असावं इतकीच अपेक्षा होती...!!



गणेश दादा शितोळे
(३ डिसेंबर २०१६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा