माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

सिंगल है इसका यकीन दिलाना बहुत मुश्किल


               आजकाल बरेच मित्र भेटत असतात. अर्थात भेटल्यावर बाकी विषयांपेक्षा कविता आणि शब्दांची मोरपीस हेच विषय चर्चेत असतात. अशाच एका भेटीत मित्राने विचारलं,
"काय हे कविता लिहणं कधीपासून अन कुणासाठी...?😜😜😜😜 नाही आम्हाला पण कळू द्या कोण आहे ती..."❤❤😝😝

                    त्याला मी नेहमीचं तसं काही नाही वगैरे वगैरे उत्तर दिलं. पण या असल्या बांऊसरची सवय असली तरी माझ्या उत्तरानं भावाचं काही समाधान झालं नाही. तो वारंवार विचारत राहिला अन मी सांगत राहिलो. ती भेट अजूनही लक्षात आहे. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा सिंगल असल्याचा पश्चाताप वाटायला लागला. कविता करताना कधी असं वाटलं नाही. कारण प्रेम कविता करायला प्रेमात पडायलाच हवे असं काही गरजेचं नव्हतं. कारण आजवर लिहिलेल्या बहुतांश कविता अशाच मित्रांच्या प्रेमाकरता लिहून दिल्या होत्या. अनेक लेख लिहून दिले. काहींची प्रेम प्रकरणं त्यातून जुळून आली. काहींनी काय झालं कधी कळवलंच नाही. दुसऱ्याच्या भावना आपल्या कविता/लेख यामधून लिहिताना आपल्याला त्या जगायला लागतात एवढंच यामागचं गुपित होतं. पण त्या भावनांमधे प्रेम करायला आणि जगायला लागतं हेच विसरुन गेलो. त्यादिवशी याची जाणीव झाली.

                  सोबत याच कविता लेख यामुळे काही मित्रांची स्टेटस सिंगल मधून इन रिलेशनशिप मधे बदलली. तर काही नव्याने प्रेमात पडले याचा आनंद आहे. काहींनी तर लग्नाचं क्रेडिटच देत लग्नाच्या स्टेजवर ओळखच तशी करून दिली. तेव्हा वाटणारा आनंद अवर्णनीय आहे. मला क्रेडिटची अपेक्षा आणि इच्छा नव्हती आणि नाही अन नसणार. शेवटी इतकंच की आपल्या थोड्याशा प्रयत्नातून कोणची मनं जुळून येत असतील तर त्याहून आनंदाची दुसरी गोष्ट नाही. आणि तसंही मी माझ्या मनाची काळजी करणं केव्हाच सोडून दिलं आहे. माझ्या मनाची काळजी घेणारे भेटेल तेव्हा भेटेल. आणि मन जुळून येईल तेव्हा येईल. पण त्या मित्राच्या भेटीने एक मात्र शिकवलं की....

"सिंगल रहना बहुत आसान काम है,
लेकिन 
लोगो को आप सिंगल है इसका यकीन दिलाना बहुत मुश्किल है...."

😂😂😂👍

गणेशदादा शितोळे
(२८ फेब्रुवारी २०१६)


शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६


तिच्या आठवणी....!!!






                      आज एक जवळच्या मैत्रीणीचं लग्न झालं. हो जवळची मैत्रीणच. मैत्रीच्या पलिकडे जाऊन असं काहीही नाही. पण मैत्रीच्या नात्याची खरी ओळख झाली ती तिच्या मुळेच. आयुष्याच्या एका वळणावर ती भेटली. अन ती भेट आयुष्याला एक वेगळी ओळख कलाटणी देणारी ठरली.  
                        आपल्याला सहसा आपल्या आयुष्यात कुणी ढवळाढवळ केलेली आवडत नाहीच. आणि त्यातली त्यात आपल्या मधे कुणी बदल करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला सहज शक्य होत नाही. पण आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात तिने ते धाडस केलं. मी आज जे काही आहे त्यात तिचा महत्त्वाचा वाटा आहे. माणसाचा स्वभाव बदलत नाही म्हणतात पण तिने माझा स्वभाव बदलला. इतका की आज विचार केला तर तो नक्की मीच होतो का हाच प्रश्न पडतो. इतका बदल तिलाही अपेक्षित नसेल कदाचित. पण या बदलाची किंमत मात्र खुप मोठी चुकवावी लागली. कदाचित त्यावेळीस मला ही किंमत जाणवली असती तर हा बदल कधीच केला नसता. 
                  आजही तिची शेवटची भेट आठवते. दहावीच्या सराव परीक्षेनंतरच्या क्लास च्या टेरेसवर ती भेटली ती शेवटची. तो दीडदोन तासांचा संवाद आठवला की प्रश्न पडतो की दहावी च्या अल्लड वयात तिच्यात इतका समंजसपणा आणि समजुतदार पणा कसा आला असावा. कदाचित अनुभव हे शिकवत असावा. तेव्हा तिचं वाक्य इतकं मनावर घेतलं नाही. शेवटची भेट कुठं ठरवून होत असते का असं म्हणत तेव्हा ते सोडून दिलं. पण आज त्याची जाणीव होत आहे. 
                              दहावीच्या त्या भेटीनंतर तिला अनेकदा भेटण्याचा प्रयत्न केला. पण कधीच योग आला नाही. तिच्या मैत्रिणींला फोन करून कॉन्टक्ट नंबर मिळाला पण त्यावर कधी फोन रिसीव्ह झालाच नाही. दहावीनंतर डिप्लोमाचं वर्ष होतं. काही काळाने मग तेही मागे पडलं. मीही कॉलेज लाईफ मधे रूळून गेलो. ऑर्कुटचं वेड डोक्यावर होतं. त्यांच दरम्यान वाढदिवसाच्या वेळी तिचा विश करणारा मेल आला. आणि तिथून मग पुन्हा संवाद सुरू झाला. पाच सहा महिने सर्व काही ठीक होते. पण कधी पुन्हा भेट झाली नाहीच. तो संवाद पण संपला. काळाच्या पडद्याआड ती कुठे गडप झाली कळलंच नाही. तिच्याशी बरचंसं बोलायचं होतं पण ते राहून गेलं. पण आजही ती सोबत असल्याचं जाणवतं. कधीही एकटं वाटलं तरी तिच्याशी बोलवसं वाटतं. आज ती सोबत नसली तरी तिच्या आठवणी सोबत आहेत.
                               काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीने फोन करून तिच्या एंगेजमेंटची बातमी दिली होती. त्याचवेळी लग्नाचं निमंत्रण पण मिळालं. पण तिचा काही फोन आला नाही. येणारही नव्हता. तसं तिने आधीच सांगितले होतेच. तीने शेवटची भेट अगोदरच ठरवलेली होती. त्यामुळे जरी निमंत्रण म्हणण्यापेक्षा अनाहूतपणे समजले होते तरी मी जाणार नव्हतोच. आणि आज गेलोही नाही. आजवर मनातच तिच्याशी बोलत आलो होतो तसंच तिला मनातच मनापासून शुभेच्छा दिल्या. पण एकदा तिच्या त्याला भेटण्याची इच्छा होती. त्याला सांगायचं होतं की तुला जगातील अशी कोणती सर्वोत्तम गोष्ट मिळाली आहे. पण ती संधी कधी आलीही नाही अन आता यावी असंही वाटत नाही. तिने ठरवलेली कोणत्याही गोष्टीत आजवर मी कधी मोडता घातला नाही आणि भविष्यात घालणार नाही पेक्षा तशी इच्छा नाही. एवढं नक्की की आयुष्यात क्वचित भेटलेली अशी अमुल्य माणसं मनात घर करून रहातात तशी ती यापुढेही कायम राहील.



गणेशदादा शितोळे
(२७ फेब्रुवारी २०१६)


भांडण पेनाचे



एकदा पेन आणि टोपनाचे झाले भांडण,
अन घ्यावा वाटला त्यांना काडीमोड....
दोघेही एकमेकांना निर्वाणीचे म्हणाले,
मला आता एकटं जगायला सोड...

पेन म्हणे टोपणाला,
झिजायचं मी अन मिरवत फिरायचं तू...
मला ठेवणार खिशात झाकून,
अन जगभर दाखवत हिंडायचं तू...

न रहावून टोपण म्हणाले पेनाला,
अडकून लटकायचं मी अन लिहायचा मान घेणार तू...
लोकांच्या दाताखाली चिरडण्याचं दुःख,
नेहमी हातात विसावणारा काय समजणार तू...

सुखदुःख समजल्यावर एकमेकांची,
भांडत म्हणणारं कोणीच उरलं नाही मी आणि तू...
पेन म्हणे मिठीत घेत टोपणाला,
लिहायचा मान घ्यायचा मी अन मुकुटाचा मान घ्यायचा तू...

मिटले एकदाचे पेन आणि टोपनाचे भांडण,
जरी घ्यावा वाटला होता त्यांना काडीमोड....
नव्याने शिकत सुखदुःखाची व्याख्या,
दोघांनीही सांधला मनामधला निखळलेला जोड...










गणेश दादा शितोळे
(२६ फेब्रुवारी २०१६)



शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६


पेन आणि टोपण




एकदा पेन आणि टोपणाचे झाले भांडण,
अन घ्यावा वाटला त्यांना काडीमोड....
दोघेही एकमेकांना निर्वाणीचे म्हणाले,
मला आता एकटं जगायला सोड...

पेन म्हणे टोपणाला,
झिजायचं मी अन मिरवत फिरायचं तू...
मला ठेवणार खिशात झाकून,
अन जगभर दाखवत हिंडायचं तू...

न रहावून टोपण म्हणाले पेनाला,
अडकून लटकायचं मी अन लिहायचा मान घेणार तू...
लोकांच्या दाताखाली चिरडण्याचं दुःख,
नेहमी हातात विसावणारा काय समजणार तू...

सुखदुःख समजल्यावर एकमेकांची,
भांडत म्हणणारं कोणीच उरलं नाही मी आणि तू...
पेन म्हणे मिठीत घेत टोपणाला,
लिहायचा मान घ्यायचा मी अन मुकुटाचा मान घ्यायचा तू...

मिटले एकदाचे पेन आणि टोपनाचे भांडण,
जरी घ्यावा वाटला होता त्यांना काडीमोड....
नव्याने शिकत सुखदुःखाची व्याख्या, 
दोघांनीही सांधला मनामधला निखळलेला जोड...


गणेशदादा शितोळे
(२६ फेब्रुवारी २०१६)


गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

मला भेटलेले आनंदयात्री - ओळखीच्या वाटेवरची अनोळखी माणसं...


                  गेली अनेक दिवस त्याच निगडी-कोथरूड वाटेने प्रवास सुरू आहे. अन अचानक अशाच एका वळणावर ते दोघे भेटतात. खरंतर मला ते अनोळखीच. ओळखीच्या रस्त्यावरून जाताना भेटलेली ती अनोळखी दोघं. समवयस्क असावीत मला. ती स्कार्फ बांधून स्कुटीवर असते. तो हेल्मेट घालून सीबीझेड वर असतो. पंधरा वीस मिनिटांच्या त्या प्रवासात दोघे रस्त्याने चालतानाही गप्पा मारत चाललेले असतात.
                    सुरवातीला दोन दिवस अनावधानाने भेटले असावेत वाटलं. पण नंतर मात्र रोजच दिसू लागले. रोजच्या त्या धाकधुकीच्या प्रवासात, एक्स्प्रेस वे वरच्या वाहनांच्या गर्दीत, हाॅर्नच्या गोंगाटात दोघं गप्पांमधे इतके गुंग होऊन कसे जात असावेत असा प्रश्न पडतो. एकदा दोनदा मी ओव्हर टेक करत बाईक दोघांच्या मधे घालण्याच प्रयत्न करत संवाद थांबवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर मलाच कसंनुसं वाटलं. आपल्याला कुणी असं डिस्टर्ब केलं तर...हा प्रश्न मनाला ज्या क्षणी पडला तेव्हा पासून आजपर्यंत मी कधी दोघांना ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न पण केला नाही. रोज त्या दोघांच्या मागे चालत न्याहाळत रोजचा प्रवास सुरू आहे. पण त्यांना पाहिलं की जाणवतं नात्यांच्या बंधनापलिकडेही त्यांच्याशी काही बंध जुळून येत आहेत.  एखाद्या दिवशी दोघे दिसले/भेटले नाहीत तरी दिवस चांगला जात नाही असं वाटतं.

बघू ओळखीच्या वाटेवरची ही अनोळखी माणसं कधी आपलीशी होतात...

( ओळखीची तर झालीच आहेत...)

गणेशदादा शितोळे
(२५ फेब्रुवारी २०१६)


सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

मुंबई पुणे मुंबई

 Image result for मुंबई पुणे मुंबई 2 

Image result for मुंबई पुणे मुंबई 2


                              कधीकधी एखादा चित्रपट आपल्या आयुष्यावर इतका परिणाम करतो की जणू आपण एका वेगळ्या विश्वात रममाण होऊन विचार करू लागतो. असे फार मोजके चित्रपट नसतील तरी ते परिणामकारक ठरलेत हे नक्की. असाच एक म्हणजे मुंबई पुणे मुंबई. आजवर कितीही वेळा पाहिला तरी पुन्हा पुन्हा पहाण्याची इच्छा होतेच. आजही तसाच झी टाॅकीजवर चित्रपट पाहिला अन एक वेगळा अनुभव मिळाला. मुंबई पुणे मुंबई च्या पहिल्या भागाइतकाच दुसरा भागही वेगळा ठसा उमटवणारा आणि संदेश देणारा आहे.

                              चित्रपट आवडण्यामागचं पहिलं कारण अप्रतिम संगीत आणि गाणी. कधी तू असो की का कळेना असो की साथ दे तु मला असो. प्रत्येक गीत तितकेच सुमधूर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि चित्रपटात एक साम्य आहे अन ते म्हणजे चित्रपटातील गौतम म्हणजे स्वप्निल जोशी हाही माझ्या सारखाच कविता लिहिणारा आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटात पहिल्या आणि दुसर्‍या भागातील अनेक संवाद म्हणजे मला माझेच वाटतात. चित्रपट विनोदाइतकाच विचार करायला लावणारा ही वाटला.

                              आयुष्याच्या ऐन तारुण्याच्या वळणावर नवी नाती जोडताना येणारे चढउतार आणि त्यातून एकमेकांवर विश्वास ठेवत नाती कशी घट्ट करावीत याचं उदाहरण म्हणजे मुंबई पुणे मुंबई. आज व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी हा चित्रपट पाहिल्याने अधिकच भावला. सतीश राजवाडे यांनी साकारलेली ही कलाकृती मनात घर करून मात्र नक्की गेली.


गणेश दादा शितोळे
(१४ फेब्रुवारी २०१६)



रविवार, १४ फेब्रुवारी, २०१६


व्हॅलेन्टाइन डे


प्रेम म्हणजे विश्वास
प्रेम म्हणजे आपुलकी
प्रेम म्हणजे ओढ
अन प्रेम म्हणजे सर्वस्व...


                प्रेम म्हणजे काय हे प्रत्येक जण आपापल्या परीने सांगेलच. पण महत्वाचे हे की प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणे. आपण प्रत्येक वेळी फक्त म्हणत असतो, "आम्ही एकमेकांना समजून घेतो." पण वास्तविक खरंच आपण समजून घेतो का हा प्रश्न एकदा स्वतःला विचारायला हवा.
'खरंच आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या मनातलं समजतं अन आपण ते समजून घेतो का..?'
                 अनेकदा दोघांना आपण प्रेमात पडल्याचं जाणवत नाही. पण भोवताली असणार्‍यांना ते जाणवत रहात. हे न कळण्यासाठी हेच कारण आहे. प्रेमात पडलो आहे अन ते व्यक्त करायलाच हवं असं काही नसतं. प्रेम व्यक्त करण्यापेक्षा ते समजून घेणे महत्वाचे असते. आजची प्रेमाची परिभाषा तशीच टिपिकल गुलाब देऊन प्रपोज करण्यापासून बदलली असेलही. कधी प्रेम डोळ्यातून व्यक्त होते तर कधी आपल्या वागण्यातून. आपण ते समजून घ्यायला हवे. अनेकदा ते समजतंही पण आपलं मन मान्य करत नाही. काही काळ गेला की मनालाही त्याची सवय होते. अन तेही एका क्षणी मान्य करते. अनेक जण म्हणतात प्रेमात ह्रदयाला जिंकावं लागतं. कदाचित ते काही अंशी खरंही असेल. पण 'प्रेमात नेहमी मनाला जिंकावं लागतं.'
                   
आजच्या दिवशी अनेक जण आपलं प्रेम व्यक्त करतील. त्याचं उत्तर देताना एकदा मनाला विचारून पाहिलं की सर्व कोडं संपेल. समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेऊन मनाला थोडा वेळ द्या. उत्तर आपोआप मिळेल. कारण प्रेमातच इतकी ताकद आहे की प्रेमच प्रेमात मनाला जिंकतं...


प्रेम म्हणजे एकमेकांच्या भावनांचा आदर करणं..
प्रेम म्हणजे एकमेकांच्या भावनांना समजून घेणं..
प्रेम म्हणजे एकमेकांच्या ह्रदयात जागा करणं..
अन प्रेम म्हणजे एकमेकांच्या मनाला जिंकणं...



व्हॅलेन्टाइन डे च्या सर्व मित्र मैत्रीणींना शुभेच्छा.



गणेश दादा शितोळे
(१४ फेब्रुवारी २०१६)



व्हॅलेटाइन डे च्या सर्व मित्र मैत्रीणींना शुभेच्छा.



प्रेम म्हणजे विश्वास
प्रेम म्हणजे आपुलकी
प्रेम म्हणजे ओढ
अन प्रेम म्हणजे सर्वस्व...

प्रेम म्हणजे काय हे प्रत्येक जण आपापल्या परीने सांगेलच.

पण महत्वाचे हे की प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणे. आपण प्रत्येक वेळी फक्त म्हणत असतो 'आम्ही एकमेकांना समजून घेतो.' पण वास्तविक खरंच आपण समजून घेतो का हा प्रश्न एकदा स्वतःला विचारायला हवा. 'खरंच आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या मनातलं समजतं अन आपण ते समजून घेतो का..?'
अनेकदा दोघांना आपण प्रेमात पडल्याचं जाणवत नाही. पण भोवताली असणार्‍यांना ते जाणवत रहात. हे न कळण्यासाठी हेच कारण आहे. प्रेमात पडलो आहे अन ते व्यक्त करायलाच हवं असं काही नसतं. प्रेम व्यक्त करण्यापेक्षा ते समजून घेणे महत्वाचे असते. आजची प्रेमाची परिभाषा तशीच टिपिकल गुलाब देऊन प्रपोज करण्यापासून बदलली असेलही. कधी प्रेम डोळ्यातून व्यक्त होते तर कधी आपल्या वागण्यातून. आपण ते समजून घ्यायला हवे. अनेकदा ते समजतंही पण आपलं मन मान्य करत नाही. काही काळ गेला की मनालाही त्याची सवय होते. अन तेही एका क्षणी मान्य करते. अनेक जण म्हणतात प्रेमात ह्रदयाला जिंकावं लागतं. कदाचित ते काही अंशी खरंही असेल. पण 'प्रेमात नेहमी मनाला जिंकावं लागतं.' 

आजच्या दिवशी अनेक जण आपलं प्रेम व्यक्त करतील. त्याचं उत्तर देताना एकदा मनाला विचारून पाहिलं की सर्व कोडं संपेल. समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेऊन मनाला थोडा वेळ द्या. उत्तर आपोआप मिळेल. कारण प्रेमातच इतकी ताकद आहे की प्रेमच प्रेमात मनाला जिंकतं...

व्हॅलेटाइन डे च्या सर्व मित्र मैत्रीणींना शुभेच्छा.

गणेशदादा शितोळे
(१४ फेब्रुवारी २०१६)


शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६


 वाढदिवसाच्या शुभेच्छा गोट्या...!



अॅडमीशनच्या दिवशी झालेली ओळख कधी मैत्रीत बदलली कळलंच नाही.
.
मित्र कसला भाऊच माझा...
.
फक्त दोनचारशे लोक आम्हाला मित्र समजतात...
.
.
भावाबद्दल सांगायचं अन बोलायचं काय....
.
सगळच तसं अलेबलच...
.

8055 कुठंही नंबर दिसला की बाऊ डोळ्यासमोर चउभा राहणार...
जगातील नामांकीत कंपन्यांच्या बाॅसला बाॅस असण्याची जितकी क्रेझ नाही इतकी क्रेझ भावाला...
.
मोबाईल फोन मधल्या कॉन्टक्ट एन्ट्री संपत आल्या पण भावाच बाॅस नंबरचं वेड काय जायना...
.
भावाला मधीच पुस्तक वाचण्याचं फॅड सुचतं तर
कधी मोक्कार हिंडायची आवड निर्माण होती..
.
लपवाछपवीत सुरू असलेल्या भलत्याच स्टोरीज गोलमाल प्रकरणं...
तर कधी बेधडक समोर येऊन अंगावर घेण्याचा अंदाज....
 .
बाकी जगाशी कोणत्याही विषयावर बोलणार...
पण गेले काही दिवस ज्या व्यक्तीशी ज्या विषयावर बोलयचं म्हणतोय तर गप्प बसणार....
 .
महाराष्ट्र म्हणु नका जगातल्या कानाकोपर्‍यापर्यंत कुठेही फिरायला गेले तरी घाबरायचं कारण नाही.
सगळीकडे भावेच पाव्हणे आहेत...
अगदी चालती ट्रेन असो की वेटींग लाईन...
.
.
भाऊला व्हाटसअपचं तुफान वेड...
सगळ्या मित्रांचे एकत्रीत केले तरी कमीच पडतील एवढी ग्रुपची संख्या.
.
.
भाऊ अंगाशी येणारेच मॅटर करणार...
अन अंगाशी आलं की बिनधास्त मित्राच्या नावावर खपवणार...
.
असा आमचा मित्र, भाऊ, सखा रोहित ननावरे उर्फ गोट्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन वर्षात पदार्पण करीत आहे. या आमच्या दोस्ताला
दोस्तीची कसम देत वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
.
भावाला गेले काही दिवस बोल म्हणतोय ते त्याने बोलावं. अन आयुष्याची नवी इनिंग नवीन वर्षाच्या निमित्ताने सुरू करावी हीच सदिच्छा व्यक्त करतो.





गणेश दादा शितोळे
(२२ फेब्रुवारी २०१६)



गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६

Happy_Birthday_FACEBOOK


#Thanks_MARK....

फेसबुक...
एक अफाट लोकप्रियतेचं जग...
अन एक वेगळंच विश्व...

                                आज फेसबुकने 12 वर्षे पूर्ण केली. जेव्हा फेसबुक हे नाव कानावर पडलं तेव्हा ऑर्कुटचं फॅड होतं. त्यामुळे सुरुवातीला ऑर्कुट वापरणं म्हणजेही स्टेटस सिंबॉल बनलं होतं. माझा आणि फेसबुकचा खरा संबंध आला डिप्लोमा कॉलेज नंतरच. इंटरनेटच्या महाजालावर विविध विषयांवर माहिती पाहताना फेसबुकचीही ओळख झाली. अकाऊंट तयार झालं. सुरवातीला कोणी मित्र परिवार जॉईन नसल्याने काही दिवस आजवर भेटलेल्या अनेकांची नावं आठवली की फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली जात होती. काही अंदाज बरोबर लागले काही चुकलेही. अनेक अनोळखी माणसं फेसबुक फ्रेण्ड झाली. सुरुवातीला असणारी क्रेझ कालांतराने अजूनच वाढत गेली. रोज नवीन ग्रुप्स, पेजेस, लाईक्स वाढतंच गेलं. अगदी फेसबुकचं वेडं म्हणतात ना तसं वेडंच लागलं.
                                खरंतर माझं लिखाणाचा छंद वाढवण्यात फेसबुकचा अधिक जास्त हात आहे. नवीन नवीन ग्रुपमध्ये जॉईन झाल्यावर नवीन पोस्ट वाचनात येऊ लागल्या. मलाही मी लिहिले होते ते पोस्ट करण्याची संधी फेसबुकच्या माध्यमातून मिळाली. मग वाढत्या लाईक्स कमेंट्स मुळे लिहिण्याचा अधिक हुरूप येत गेला. मीही काही ग्रुपचा नियमितपणे वाचक झालो. अन माझ्या ही पोस्ट्सचे काही वाचक होत गेले. यातूनच नवीन मित्रांशी ओळख वाढली अन कधी हक्काची माणसं होऊन गेली माहिती नाही.
                                इंजिनिअरींग कॉलेजच्या सुरुवातीला वाटणारी हे फेसबुक वेड नंतर नंतर कमी झालं. काही काळ तर थांबलंच होतं. माझा अधिक कल माझ्या लिखाणात आणि वाचणाकडं झुकला होता. दरम्यानच्या काळात हा तुटलेला संवाद पुन्हा सुरू झाला. कॉलेजमधल्या गॅदरींग निमित्ताने होणार्‍या सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या आयुष्यावर बोलु काही या कार्यक्रमाची माहिती फेसबुक वरूनच समजली. मी डिप्लोमा पासूनच संदीप-सलील जोडीचा फॅन होतोच. संदीप-सलील प्रेक्षकांमधून आलेल्या फरमाईशी सादर करतात हे माहित असल्याने कॉलेजमधल्या कार्यक्रमासाठी तयारी म्हणून मी सलील कुलकर्णी यांच्या मिस्टर स्पायडरमॅन या गाण्याच्या ओळी वापरून एक वेगळंच गाणं तयार केले होते. मिस्टर छोटामॅन.  कॉलेजमधे ते गाणं संदीप-सलील यांनी सादर करण्याची संधी काही कारणाने हुकली. त्या गाण्याला फेसबुकच्या आयुष्यावर बोलु काही पेजवर पोस्ट केल्यावर मिळालेला तुफान प्रतिसादच माझी फेसबुकशी पुन्हा नाळ जोडण्यास कारणीभूत ठरला.
                                सुरवातीला असणारी फेसबुकची क्रेझ कमी झाल्यावर एकदा सहज फेसबुकच्या दुनियादारीत आपल्या कडंही पहायला गेलो तर एक आढळून आले. सुरुवातीला पाठवलेल्या फ्रेण्ड रिक्वेस्ट मुळे फ्रेण्ड लिस्ट कधीची चार हजारांवर पोहोचली होती. त्यातील काही जणांशी फ्रेण्ड रिक्वेस्टच्या पलीकडे काही शेअरींगच झाले नाही. त्यामुळे हळूहळू ही गर्दी कमी करण्यासाठी अनेकांना अनफ्रेण्ड केले. जशी जशी मॅच्युरिटी वाढत गेली तसतशी काय लाईक/शेअर/पोस्ट करावे काय नाही याची जाण येत गेली.
                                या दरम्यानच्या काळात फेसबुकच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टही घडल्या. एक तर माझ्या जून्या शाळेतील (साधना विद्यालय, हडपसर) मित्रांशी फेसबुकच्या माध्यमातून पुन्हा भेट झाली. ( या गोष्टीला दोन तीन वर्षे उलटून गेली तरी अजूनही ती भेट ऑनलाईनच घडली आहे. प्रत्यक्षात कधी भेट होणार आहे पाहू. नुकताच एक मित्र कॉलेजवर भेटलाही. असो.)
                                दुसरी गोष्ट म्हणजे मला माझ्या लिखाणाला सादर करण्याची संधी फेसबुकच्या माध्यमातून मिळाली. त्याद्वारे मिळणारा प्रतिसाद पाहून नुकतेच नवीन वर्षाच्या निमित्ताने मी माझे स्वतःच्या लिखाणाचे  शब्दांची_मोरपिसं हे फेसबुक पेज सुरू केलं. अल्पावधीतच त्याला काही प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला आहे. फेसबुकवर अनेक चांगल्या साहित्याशी संबंधित ग्रुप/पेजेस शी संलग्न झालो आहे. याच फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून मला 89 व्या साहित्य संमेलनाच्या करीता कविता पाठवून निवड होण्याची संधी मिळाली. काही कारणाने ती सादर करता आली नाही. असो. पण त्यानिमित्ताने साहित्य क्षेत्राशी एक वेगळी नाळ जोडण्यास यश आलं आहे.
                                फेसबुकवर मित्रांच्या वाढदिवसाला पोस्ट करणार्‍या कॅप्शन (क्योट्स) मुळे #कॅप्शनकिंग अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अनेकदा मित्रांचा प्रतिसाद येत असतो की त्यांच्या टाईमलाईनवरची कॅप्शन त्यांच्या मित्रांना एवढे आवडले की चौकशी करत असतात. काही फ्रेण्ड रिक्वेस्ट फक्त या कारणावरूनही आल्या आहेत.
                                फेसबुकच्या माध्यमातून नाती दुरावतात असं म्हणतात पण मला कधी तसं वाटलं नाही. उलट फेसबुकच्या माध्यमातूनच अनेक माणसं जवळ येत गेली. "रिश्तोंमे दुरीया बढनेसे ज्यादा फासलो की दुरिया बढकर भी गहरायीया आयी."
मैत्री मधला तुटलेला संवाद पुन्हा साधण्यास फेसबुकमुळेच शक्य झालं.
                                आज फेसबुकच्या जोडीला #व्हाटसअप आलं आहे. पण त्यामुळे माझ्या तरी फेसबुकच्या प्रेमावर काही फरक पडल्याचं जाणवत नाही. आजही व्हाटसअपपेक्षाही फेसबुक जवळंच वाटतं. जणू फेसबुक जवळचा मित्रच आहे. फेसबुकसोबतच आनंद, दुःख, राग, द्वेष, प्रोत्साहन असं बरचं काही शेअर केलं. या निमित्ताने मंगेश पाडगावकर यांची कविता आठवली. #मन_मोकळं_मोकळं_करावं
                                मला जेव्हा जेव्हा मन मोकळं करावंसं वाटलं तेव्हा याच फेसबुकच्या वाॅलवर मोकळं केलं. काही गोष्टी कोणाला स्पष्ट सांगता आल्या नाहीत त्या फेसबुकच्या माध्यमातून त्या व्यक्तीला पोहचल्या. मग तो "आनंदही अश्लील झाला आहे, मी मैत्रीचा निरोप घेतोय, माफ कर मित्रा,  राग, आठवणींच्या हिंदोळ्यावर, चुकलेल्या वळणावर " अशा कितीतरी कवितांच्या माध्यमातून मला जे ज्या व्यक्तीला सांगायचे होते ते पोहचले. अजून काही बाकी आहे तेही फेसबुकच्या माध्यमातून पुढे येईलच.
                                मार्क झुगेरबर्गने चार मित्रांच्या साथीने 4 फेब्रुवारी 2004 ला फेसबुक जगासमोर आणले आणि अनेक लोकांना जोडण्याचं काम केले याचा आनंद वाटतो. हा दूवा साता समुद्रापलिकडची अनोळखी माणसं आपलीशी करणारा महत्वाचा दूवा ठरला आहे. नुकतेच एका भारतीय तरुणाच्य् लग्नाला फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन "आई" नात्याचा बंध निर्माण होऊन एक परदेशी महिला उपस्थित होती. हे केवळ फेसबुकच्या  उपलब्धतेमुळेच. आज फेसबुकच्या वर्धापनदिनानिमात्ताने हा फेसबुकच्या साथीने मैत्रीचा प्रवास असाच सुरू रहावा हीच अपेक्षा आहे.




गणेश दादा शितोळे
(४ फेब्रुवारी २०१६)



मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१६

रोहितच्या आत्महत्येच्या निमित्ताने....


नरेंद्र मोदी म्हणाले "आम्हाला लोकांचे दु:ख कळतेय....

खरंच जर यांना लोकांची दु:ख कळली असती तर आज ही वेळ आली नसती. राजकीय व्यक्ती फक्त उसणं रडणं दाखवत आश्वासन देत खोटा आधार देतात अन त्याला मोदीही अपवाद नाहीत. गेल्या वर्षभरात कित्येक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. काय कळलं यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्यामागचं दुःख..?

दोन चार लाखाची मदत...

बाकी काय करतात हे..?

ढिम्म नुसते...

अनेक विचारवंत मारले गेले. काय वाटलं, कळलं यांना दु:ख.?

काहीही नाही. 

काय प्रयत्न केले शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी...?

काय केलं विचारवंताच्या हत्या रोखण्यासाठी...?

काहीही नाही...

कोणतंही ठोस पाऊल उचलले नाही...

सरकारी कर्मचारी, मंत्री संत्री सहावा वेतन आयोगाचा लाभ घेऊन मोकळे झाले सातवा वेतन आयोग घ्यायला....

पण शेतकऱ्यांना फायदेशीर स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मानसिकताही नाही यांची अन काय कळणार यांना लोकांचं दुःख...?

बळी (शेतकरी) कालही राजा आणि आजही राजा- नाना पाटेकर असं म्हणतात. . . . .

पण नाना ह्यात साम्य एकच, त्याला कालही पाताळात घातले होते आणि आजही त्याला पाताळात घालून त्याचा बळी देण्याचे काम सुरूच आहे...

अन फरक इतकाच की तेव्हा वामन होता अन आता सरकार ती भूमिका वठवत आहे


गणेशदादा शितोळे
(०२ फेब्रुवारी २०१६)