माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, ७ मार्च, २०१५

काॅलजेचा कट्टा
खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात ही अशी गोष्ट असते की ती कधी विसरली जात नाही. ...
या कट्यासोबत असतात अनेक आठवणी....
काहीशा मजेदार तरी डोळे ओले करणार्‍या....

लवकरच या काॅलेज कट्ट्याचा मी खरंतर निरोप घेणार आहे पण फक्त फाॅरमली...
तसा हा कट्टा कायम सोबतच राहणार आहे हे नक्की. ..
मित्रांची आठवण ठेवत अन मैत्रीला साद घालत....

याच काॅलेज कट्ट्यावर केरळ ट्रीपमध्ये सुचलेली कविता....




काॅलेजच्या कट्ट्यावर...
.

आयुष्य हे रमलेले काॅलेजच्या कट्ट्यावर. ...
नेहमीच्या त्या अड्यावर...
गप्पांच्या रंगलेल्या मैफिलीत....
आठवत राहते काॅलेज लाईफ नेमकं संपल्यावर....

लेक्चर बंक करोनी जमतो असा कॅन्टीनमधे अड्डा...
कधीचा फस्त होता मिसळ पाव अन वडा...
होतो थोडा हसी मजाक अन राडा...
आठवणीत उरतो मग केलेला कल्ला तेवढा...

कोणी एकच असते इथं ऐश्वर्या राय
अन ढीगभर असतात सलमान खान...
प्रत्येकालाच वाटते तीच आपली काजोल...
अन मीच तिचा शाहरुख खान...
तिला मिळवण्यासाठी समजतो स्वतःला बाजीराव सिंघम...
मोहबते अन रब ने बना दी जोडी करता करता
होऊन जातो तेरे नाम अन बेवफा सनम...

प्रेमही होत नाही अन नाही होत मग अफेअरही...
मात्र एका टाईमपाससाठी लढतात सख्खे मित्रही...
आयटमवरच्या भांडणात संपून जाते मैत्रीही...
आता वाटतं राहून गेलं निभावणं मैत्री अन करायला प्रेमही...


गणेश दादा शितोळे
(०७ मार्च २०१५)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा