केरळच्या प्रवासात आमचे जिवलग मित्र आम्हाला मित्रपरिवाराला सोडून जेव्हा मैत्रीणीच्या मागे लागले होते तेव्हा वैतागून आम्ही सगळ्यांनी लिहीलेला हा पाळणा....
(मुद्दामहून नावं टाकली नाहीत. परत सगळंच अवघड व्हायचं...)
जा बाबा जा रे जा...तिच्याच मागे जा...
ट्रेन मधे गेली एका सोबत...
तो मात्र बसला फक्त मागे हिंडत...
जा बाबा जा रे जा...
तिच्याच मागे जा...
विंडो सीट वेळी दिसली दुसऱ्याच सोबत...
तो मात्र बसला फक्त डबा नेऊन देत...
जा तोजा रे जा...
तिच्याच मागे जा...
अंताक्षरी वेळी दिसली सरांसोबत ...
तो मात्र बसला अंताक्षरी बघत...
जा बाबा जा रे जा...
तिच्याच मागे जा...
लंच वेळी गेली अजून तिसऱ्याचसोबत...
तो मात्र बसला फक्त भूक लागली करत...
जा बाबा जा रे जा...
तिच्याच मागे जा...
पद्मनाभला गेली चौथ्याच सोबत...
तो मात्र बसला फक्त मागे मागे हिंडत...
जा बाबा जा रे जा...
तिच्याच मागे जा...
बोटीत बसायला परत गेली पाचव्याच सोबत...
तो मात्र बसला फक्त पुढे टिकटं काढंत...
जा बाबा जा रे जा...
तिच्याच मागे जा...
विवेकानंद टेम्पल ला परत गेली भलत्यासोबत...
तो मात्र बसला फक्त एका फोटोसाठी वाट बघंत...
जा बाबा जा रे जा...
तिच्याच मागे जा...
शेवटी डिनरला बसली त्याच्यासोबत...
पण तो बसला फक्त तिलाच खायला घालंत...
जा बाबा जा रे जा...
तिच्याच मागे जा...
गणेशदादा शितोळे
(१८ मार्च २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा