माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, २० मार्च, २०१५

तू गेली जरी दूर....


तू गेली जरी दूर त्या वाटेवरी....
जीव होता तिथेही टांगलेला तुझ्यावरी...
साद घालतो मी कोवळी ऐकू येते का बघ तुला उरी...
धाव घेई मन पुन्हा पुन्हा त्या वाटेवरी...
बावरंलेले मन सावरू मी कसे क्षणभर तु मला सांगना सांगना
वाट बदलली का हरवून गेली का अशी तू मला सांगना सांगना...

बांधता प्रेम ओढीचे हे परस्परांसवे...
रेशीमगाठ बांधत जुळले नाते नवे...
अबोल शब्दातही नात्याला बोल सुचावे...
हरवलेल्या क्षणात त्या तू मला होकार द्यावे....
दे ते क्षण पुन्हा अन सावरू दे माझ्या या मना...
वाट बदलली का हरवून गेली का अशी तू मला सांगना सांगना...

ठसे कोरले तू प्रेमाचे हळव्या ह्रदयावरी...
शोधतो तुला भटकलेल्या वाटांवरी...
सोबतीला ना कोणी चालताना तरी...
शोधतंय मन माग उरले का या वाटांवरी...
मी शोधावी कशी हरवलेली वाट तु सांगना सांगना....
वाट बदलली का हरवून गेली का अशी तू मला सांगना सांगना...

येऊनी मनी आठवणी भेटती चोरून आसवे...
जुनेच भास अन जुनेच क्षण का आठवे...
आघात हे असे खोलवर का रूतावे...
जखम ही कसला मनाला ठाव नसावे..
ते क्षण कसे सतवत रहाते पुन्हा पुन्हा मना...
वाट बदलली का हरवून गेली का अशी तू मला सांगना सांगना...

आसवे ती प्रेमाची ओघाळत रहाती गालावरी...
अन बोलण्या शब्दही आज ते आतुरलेत ओठांवरी...
अडखळत श्वास रोखून जगतो तरी...
वाट बघते मन तू परत येशील माघारी...
घेण्या श्वास बोलण्या तुझ्या मना कधी येशील सांगना...
वाट बदलली का हरवून गेली का अशी तू मला सांगना सांगना...

खोल प्राणातली ऐकू येतेय मैहफील सुनीसुनी...
अडखळता श्वास गुंतलेलं मन साद देत आहे जुनी...
ओढ लागली क्षणात भेटण्या मनी...
तू ये तू ये पुन्हा भेटाया मज मागे परतूनी...
बावरंलेले मन सावरू मी कसे क्षणभर तु मला सांगना सांगना
वाट बदलली का हरवून गेली का अशी तू मला सांगना सांगना...

कवितेतलीही कडवी बोलती...
मला वेडं लागावे लिहण्यताचे की प्रीती
शब्दांनीही फुंकर घालावी खोलवरच्या जखमांना किती
भास तुझे होती आठवण दरवळती भोवती
वेडा मी उभा इथे या क्षणी अन दूर तू का सांगना...
वाट बदलली का हरवून गेली का अशी तू मला सांगना सांगना...


गणेश दादा शितोळे
(२० मार्च २०१५)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा