आयुष्यात आपली माणसं निवडण्यात,
खरंच माझी चुक झाली...
चांगली की वाईट माहिती नाही,
पण एखाद्यावर चटकन विश्वास ठेवण्याची,
अजब सवय मला जडली...
अन आयुष्याची गाडी घसरत गेली...
वाटलं काही काळ हीच आपली माणसे,
आयुष्य जगायचं फक्त त्यांच्याच साथीने,
अन अचानक विश्वासाचे दोर सुटू लागले,
आपली माणसंच परकं करून जात गेली....
पारख कशी करायची असते आपल्या माणसांची,
उत्तरे मला अजून नाही उलगडली...
काळाच्या पडद्याआड जाताच प्रश्न,
आपली माणसंच उत्तरं देत गेली...
आयुष्याची वाट अशीच चालत राहिली..
प्रत्येक वळणावर जूनीच गणिते समोर आली...
उत्तरं कळत होती पण गणिते नाही सुटली...
मात्र चालता चालता आपली माणसं सुटत गेली...
म्हणून आज,
आज वाटतयं,
आयुष्यात आपली माणसं निवडण्यात,
खरंच माझी चुक झाली...
खरंच माझी चुक झाली...
चांगली की वाईट माहिती नाही,
पण एखाद्यावर चटकन विश्वास ठेवण्याची,
अजब सवय मला जडली...
अन आयुष्याची गाडी घसरत गेली...
वाटलं काही काळ हीच आपली माणसे,
आयुष्य जगायचं फक्त त्यांच्याच साथीने,
अन अचानक विश्वासाचे दोर सुटू लागले,
आपली माणसंच परकं करून जात गेली....
पारख कशी करायची असते आपल्या माणसांची,
उत्तरे मला अजून नाही उलगडली...
काळाच्या पडद्याआड जाताच प्रश्न,
आपली माणसंच उत्तरं देत गेली...
आयुष्याची वाट अशीच चालत राहिली..
प्रत्येक वळणावर जूनीच गणिते समोर आली...
उत्तरं कळत होती पण गणिते नाही सुटली...
मात्र चालता चालता आपली माणसं सुटत गेली...
म्हणून आज,
आज वाटतयं,
आयुष्यात आपली माणसं निवडण्यात,
खरंच माझी चुक झाली...
गणेश दादा शितोळे
(०५ ऑगस्ट २०१५)
(०५ ऑगस्ट २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा