माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, ५ ऑगस्ट, २०१५

आयुष्यात आपली माणसं निवडण्यात,
खरंच माझी चुक झाली...




चांगली की वाईट माहिती नाही,
पण एखाद्यावर चटकन विश्वास ठेवण्याची,
अजब सवय मला जडली...
अन आयुष्याची गाडी घसरत गेली...

वाटलं काही काळ हीच आपली माणसे,
आयुष्य जगायचं फक्त त्यांच्याच साथीने,
अन अचानक विश्वासाचे दोर सुटू लागले,
आपली माणसंच परकं करून जात गेली....

पारख कशी करायची असते आपल्या माणसांची,
उत्तरे मला अजून नाही उलगडली...
काळाच्या पडद्याआड जाताच प्रश्न,
आपली माणसंच उत्तरं देत गेली...

आयुष्याची वाट अशीच चालत राहिली..
प्रत्येक वळणावर जूनीच गणिते समोर आली...
उत्तरं कळत होती पण गणिते नाही सुटली...
मात्र चालता चालता आपली माणसं सुटत गेली...

म्हणून आज,
आज वाटतयं,
आयुष्यात आपली माणसं निवडण्यात,
खरंच माझी चुक झाली...


गणेश दादा शितोळे
(०५ ऑगस्ट २०१५)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा