माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५


आयुष्याच्या वाटेवर शोध अजून संपला नाही...

होता आयुष्याचा रस्ता खडतर
अन वाट वळणावळणांची तरी
चालताना वाटांवरून मी
कधीच माघारी फिरलो नाही...


गेलो कधी खाच खळग्यांतून
पडलो अनेकदा खड्ड्यात तरी
प्रत्येक पुढचं पाऊल टाकताना
मी कधी डगमगलो नाही...


वाटांवरून चालताना आली
संकटे सामोरी ढीगभर तरी,
संकटांना भूतासारखे मानगुटीवर
मी कधी बसू दिलं नाही...


लढलो जिंकण्यासाठीच
केला संकटांचा सामनाही स्तब्धतेने,
किंचितशा अडचणीलाही
मी कधी कमी लेखलं नाही...


चालत होते पुढे मागे
कित्येक जण ओळखी अनोळखी तरी,
आयुष्याचा हा प्रवास
मी कधी मध्यांतरी थांबवला नाही...


भेट होत राहिली हक्काच्या माणसांची
वळणावळणावरच्या थांब्यावर तरी,
कोणीतरी मला आपलं हक्काचं समजेल म्हणून
मी कधी थांबलो नाही... 


वाट चालतच आहे मी माझी
कोणी भेटेल मलाही आपलं म्हणणारं या प्रवासात,
म्हणून आयुष्य पुढे सरकले तरी
माझा शोध अजून संपला नाही...


चालायचं आहे मला पुढेच
गाठायची आहेत शिखरेही अनेक,
पण म्हणून मला आज
क्षणभर विश्रांतीला थांबायचं असं नाही...


गणेशदादा शितोळे
१४ ऑगस्ट २०१५



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा