माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, ४ जून, २०१८


पाऊस…!!!

पाऊस म्हणजे आभाळगारूडंच
उथळ मनावर थाटलेलं...
जणू ऋतूनं कूस बदलताच
अंग ओसांडून चींब झालेलं...

क्षितीजालाही समांतर रेषांमधे
आभाळानं व्यापून टाकलेलं...
आयुष्याच्या गाभ्यात रुजवून जगणं
चाहुलीनंच मन आनंदून गेलेलं...

थुईथुई नाचत नाचत
पावसाचे शालीन सौंदर्य नटलेलं...
साठवून मन तृप्त होऊन
ढगांच्या सावलीला विसावलेलं....

शहारणाऱ्या गारव्यासोबत
इकडून तिकडं मन भिरभिरलेलं
चातकासारखा आभाळथेंब शोषताना
जलतपस्येत ध्यानस्थ होतं झालेलं...


गणेश शितोळे
०४ जून २०१८




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा