माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७


इच्छा...!!!


भोवताली ढीगभर गर्दी असूनही,
आस असते कुणातरी एकाची...
कितीही इच्छा पूर्ण झाल्या तरी,
प्रत्येक वेळी नवीन इच्छा असते मनाची...

साद घालणारे असतात हजारो,
वाट बघत असतो त्या एका हाकेची,
एक इच्छा पूर्ण करण्यासाठी,
तयारी असते आयुष्यभर थांबण्याची...

अनेक जण भेटवेले असतात,
आतुरता असते एका भेटीची...
तगमग अन घालमेल होते नुसती,
मिठीत सामावून घेण्याची...

आठवणी सांगणारे असतात अनेक क्षण,
ओढ असते त्या एकाच क्षणाची...
डोळे मिटून अन डोळे भरून,
त्या एकाच क्षणाला डोळ्यात साठवण्याची...

शेवटी काय तर हेच असते,
इच्छेचीही हीच इच्छा असते....
आयुष्य जगता जगता
सर्व इच्छा पूर्ण करण्याची...


गणेशदादा शितोळे
(११ नोव्हेंबर २०१७)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा