माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७


एका मध्यरात्री...!!!


मध्यरात्री दुचाकीवर बाहेर पडलो की,
भोवताली असतात सुनसान रस्ते...
कुठूनतरी येणारा कुत्र्यांचा भूंकण्याचा आवाज,
तरीही मन मनातल्या बोलत असते...

शहारणारा गारवा हळूच अंगाला चाटून जातो,
बेभान होऊन जाताना कशाचीही चिंता नसते...
मनातल्या विचारांसोबत,
अंतर फक्त मागे पडत असते...

कुठे जायचं अन कुठं थांबायचं,
काहीही माहिती नसते...
अन अचानक एका शेकोटी दिसली की,
पिळलेली मुठ थांबते अन तळवा खाली दाबते...

उडणार्‍या ज्वाला पाहूनही, 
मन मनातल्या मनात बोलतंच असते...
शरीराला उब घ्यावशी वाटते अन,
मन शब्दांची उब घेत बसते...

हळूच एक ठिणगी हाताला चाटून गेली की,
मन कुठे भानावर येते....
स्वतःलाच काय अन कुठे प्रश्न विचारत,
किक देत घराकडे घेऊन जाते...


गणेशदादा शितोळे
(११ नोव्हेंबर २०१७)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा