माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७


लिहीणार्‍या हातांमधे...!!!


लिहीणार्‍या हातांमधे,
बळ असतं विचारांचं....
समोरच्याच्या मनामधे,
पडणार्‍या ठिणगीचं...

तेवत रहाते मशाल,
जळण असतं शब्दांचं...
विझण्याची नसते चिंता,
मन जडलेले असतं वार्‍याचं...

उसळत असतो डोंब,
ठिणगीनं मन जळत वाचणाराचं...
रागावतं, कावतं अन हसतं,
मनातल्या मनात स्वतःचं...

अन येते अचानक कुठून नेम हुकलेली गोळी,
लक्ष भेदतं लेखकाच्या काळजाचं...
लेखक मरतो पण विचार तसाच रहातो,
मोल कळत नसतं त्याला फोफावणार्‍या शब्दांचं...

गणेशदादा शितोळे
(११ नोव्हेंबर २०१७)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा