माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, २४ मे, २०१६

बदलला नाही रंग माणूसकीचा...!!!

 

जन्माला आलो की मिळतात काही अनाहूत लेबलं,
अमक्या जातीचा अन तमक्या धर्माचा.
कळतं तर नसतं तेव्हा काहीही तरी पण,
रोवला जातो विचारच एकमेकांच्या द्वेषाचा...

कळू लागले जरासं बरं काही की,
वाटून घेता प्रत्येक भाग निसर्गाचा...
निळं आभाळ,  तांबडा सुर्य अन हिरवा निसर्ग,
सगळा खेळ जळमटांच्या रंगाचा...

यातूनही एक मात्र नक्की आहे,
जातीधर्माच्या जळमटांनी केला थयथयाट तरी...
बदलले नाही रक्त अन,
बदलला नाही रंग माणुसकीचा...








गणेश दादा शितोळे
(२४ मे २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा