माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, १२ मे, २०१५

आत्ताच डिप्लोमॅटच्या लग्नाला जाऊन आलो. बर्‍याच दिवसांनी जुने मित्र भेटले. त्या दोन मिनिटांच्या भेटीत काॅलेजचे ते जूने एकत्रित घालवलेले दिवस आठवले अन पुन्हा एकदा काॅलेजच्या कट्ट्यावर जावंस वाटलं. अशाच डिप्लोमॅट सोबतच्या आठवणी जाग्या करताना लिहलेली ही कविता. ...


मित्र म्हणजे आयुष्याच्या नाटकातील एक पात्र....

चंद्राच्या साक्षीने जागत होतो रात्र...
शोधत होतो आयुष्याच्या नाटकातील काही पात्र....
अन आयुष्याच्या वाटेत सापडत गेले हरवत चाललले मित्र...
मनाच्या कोपर्‍यात आठवणीत उरलेत तेवढेच मात्र..

होते काही कधी जीवाला जीव देणारे...
तर कधी माझ्या साठी कानाखाली खाणारे...
दुनियादारी सोबत जगणारं आयुष्य
सात दिवसं बहिरं होऊन जगणारे...

होते काही मला माझे सच्चे मित्र वाटणारे...
पण काॅलेज संपलं की संवाद संपवणारे...
आयुष्यात अर्ध्यावरच साथ सोडणारे...
मैत्रीचा एक असाही अनुभव देऊन जाणारे...

होते काही ऑनलाईन मैत्री झालेले..
स्वतःहून फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवलेले...
लपून रहाण्यासाठी इनव्हिजीबलचा आडोसा घेतलेले...
फेसबुक व्हाट्स अप पुरतेच मैत्री मानत असलेले..

होते काही नात्यांची पकड घट्ट करणारे...
खांद्यावरचा हात कायम सोबत ठेवणारे...
मित्रांच्या गर्दीतही आपलं अस्तित्व ठिकून ठेवणारे...
मैत्रीचं सामर्थ्य विश्वासानं जपणारे....



गणेश दादा शितोळे
(१२ मे २०१५)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा