माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, १५ एप्रिल, २०१८


झोपेची मजा...!!!

का कुणास ठाऊक आता
पहिल्यासारखी सकाळ कधी भासतंच नाही...
कितीही झोपावं वाटलं तरी
कोंबड्याच्या आरोळीने झोपमोड होतंच नाही..

डोळे उघडले की दिसणारं
निरभ्र आकाश दिसतंच नाही...
शहारणारा मंद गार वारा
भोवतालीही फिरत नाही...

आता ती साखरझोपेत पडणारी स्वप्नही
पहिल्यासारखी येत नाहीत...
किंचितशी जाग आली तरी
सकाळची प्रसन्न सुरवात  होत नाही..

आता ते सर्व बदललंय
गावातून शहारात आल्यावर सगळंच हरवलंय...
पैसा, सुखाच्या शोधात अन सोशल जगण्यात
अंगणातल्या झोपण्याची मजा येत नाही...


गणेशदादा शितोळे
(१५ एप्रिल २०१८)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा