माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, १३ एप्रिल, २०१५


नुकताच इंजिनिअरींगचा निरोप समारंभ (सेण्डाॅफ) झाला...
खरंतर गेल्या बॅच (स्पेशल 26) च्या वेळीच बरंच बोलायचं होतं पण आमच्याच मित्रांच्या दुनियादारीनं ते राहिलं अन राहूनच गेलं...
वाटलं यंदा तरी काही बोलावं पण अधीच दिवसभरातल्या कार्यक्रमानं उशीर झाला अन पुन्हा एकदा बोलायचे शब्द ओठांवरच राहिले...
त्यावेळेस कशीबशी एक कविता आठवली अन सादर केली पण मनात या काॅलेज मधील दिवसांवर कविता तयार होत होती अन आज फायनली झाली...
काॅलेजमधे एकेक क्षण जगता जगता...
काॅलेज लाईफ संपलं कधी कळलंच नाही...


काॅलेज लाईफ जगता जगता भेटत गेली बरीच माणसं
कोणी वाटलं हक्काचं तर कोणी परकं कधी वाटलंच नाही...
जूळून आल्या नात्यांच्या अशा गुंफलेल्या रेशीमगाठी...
रक्ताच्या नाहीत असं कधी वाटलंच नाही...

जगलो दुनियादारी सोबत काही क्षण अविस्मरणीय....
आयुष्यात कधी असं जगेल वाटलंच नाही....
साथ सोबत क्लासमेट्सची लाभली न्यारी...
मित्रांसोबतचा असाही कॅम्पसकट्टा कधी मिळेल वाटलं नाही...

गॅदरींगच्या राजकारणाचा डाव शिकलो
पण कधी मैत्रीत राजकारण करावसं वाटलं नाही...
मित्र जोडत गेलो कायम चढत्या क्रमाने....
पण मैत्रीत कोणाला दगा द्यावा कधी वाटलं नाही...

पैशानं समाजात श्रीमंत होता येतं म्हणून...
आयुष्यात पैसा कमवण्याच्या मागे धावलो नाही...
आयुष्यात फक्त हक्काची माणसं कमावत गेलो...
म्हणून मैत्रीत गरीब असल्याचं कधी वाटलं नाही....

मित्रांसोबत दिल दोस्ती दुनियादारी करत
काॅलेज कॅम्पस कट्ट्यावर आयुष्य जगलो बरंचकाही...
काॅलेजमधे एकेक क्षण जगता जगता...
काॅलेज लाईफ संपलं कधी कळलंच नाही........!!!



गणेश दादा शितोळे
(१३ एप्रिल २०१५)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा