मसान ची जादू….
खूप दिवसानंतर आज कुठला चित्रपट पाहिला. अनेक दिवसांपासून
मित्राने चांगला चित्रपट आहे म्हणून सांगून ठेवलेल्या मसान ची जादू आज अनुभवली.
अगदी साधा अन सामान्य वाटणारा असाच. कुठलीही भव्यता, मारझोड शिवाय
साकारलेला एक चांगला चित्रपट सर्वांत उंचावर आणि सर्वांत तळाशी समजल्या जाणार्या
या ‘तरूण भारता’चा आपापल्या आयुष्याशी
चाललेला संघर्ष ‘मसान’ अतिशय
संवेदनशीलतेने आपल्याला दाखवतो. मसान जरी गंभीर प्रकारचा चित्रपट असला तरी फ्रेश
आहे. काहीतरी नवी, भावजाणिवा समृद्ध करणारी कलाकृती
पाहिल्याचं समाधान देणारा आहे. मसान’ ही तुमच्याआमच्या
आजच्या आधुनिक पण सर्वसामान्य आयुष्यात कधीही येऊ शकणार्या दु:खाची वास्तववादी
कहाणी आहे.
चित्रपटाचा शेवट एक अंधुक आशा सोडून जातो पण स्पष्ट काही
सांगत नाही. त्यामुळे ती एक शोकात्मिका असली तरी शोकांतिका नाही. 'मसान'
हा काही पॉप्युलर सिनेमा नाही. त्यात आजचे आघाडीचे समजले गेलेले
कलावंत नाहीत. त्यात मुळात फारशी गाणी नाहीत आणि लोकप्रिय होतील अशी तर नाहीच
नाही. तरीही एकदा चित्रपट सुरू झाला की, तो जबरदस्त वेगानं
आपल्याला मूळ कथावस्तूकडे खेचून घेतो इतकी विलक्षण ताकद त्याच्यात आहे. मसान
पाहिल्यावक एक जबरदस्त अनुभव आपल्यावर कोसळतो आणि त्यामुळे आपण अधिकच अंतर्मुख
होतो.
काही चित्रपट कळण्यास कठीण असतात म्हणून नव्हे तर त्या
चित्रपटात बुडी मारल्यावर समोर जे काही दिसतंय- त्यातून जे जाणवतंय- ते शब्दांत
नेमकं पकडणे अधिकच त्रासाचं असतं. या चित्रपटातील चित्र बोलतात, दृश्य
बोलतात, संवाद बोलले जातात, अतिशय
हृद्य कथा असते, एकूण चित्रपटही काही ठाम विधान करतो पण
एखाद्या डोंगरावर फिरताना भोवतालच्या ढगांतून चालावं, नी
हळूहळू पूर्ण चिंब व्हावं पण नक्की कसे नी कधी भिजलो हे शब्दांत सांगता येऊ नये
तशी आज माझी स्थिती 'मसान' हा चित्रपट
बघून झाली आहे. ‘मसान’ हा चित्रपट
भारतीय माणसांवरील संस्कार, संस्कृती, समाज
आणि रूढी-परंपरा यांच्या जोखडातून मुक्त होऊ पाहणाऱ्या तरुण मनांचा हुंकार आहे.
गंगेच्या तीरावरच्या दोन गोष्टी. एक गोष्ट संस्कृत
पंडिताच्या घरातली (देवी) तर दुसरी डोम/खालच्या जातीतल्या घरातला (दीपक). दोन
तीरावरच्या दोन गोष्टी. दोन समांतर चालणारे धागे. आणि यांना जोडणारी दुसऱ्या
गोष्टीतील तो लहान मुलगा यावेळी ती ट्रिक दाखवतो. पहिल्या गोष्टीमधली अंगठी तो
पाण्यातून शोधून काढतो आणि दुसऱ्या गोष्टीतील गरजू बापाला आणून देतो. अप्रत्यक्षपणे
या दोन गोष्ठी जोडल्या जातात. अगदीच साधेपणाने तो प्रसंग खूप मोठा परिणाम करून
जातो.
तू किसी रेल से अप्रतिम गाणं स्वानंद किरकिरेंना साकारलंय.
अजून एक आवडलेली गोष्ट: "मसान" मध्ये "आई" हे पात्र जवळपास
नाही. म्हणजे दोघंही पोरके नाहीयेत अजिबात, पण त्या दोघांचं आपापल्या
वडिलांबरोबरच नातं इतकं सुंदर मांडलंय कि आई या पात्राची गरजंच भासली नाहीये. केवळ
मूख्य पात्रंच नाही तर देवीच्या ऑफिस मधला सहकारी पण सांगतो "हम अकेले नही
रेहते पिताजी के साथ रेहते है". लहानपणापासून चित्रपटात 'आई' या पात्राचे Trump Card वापरलेलं
बघायची सवय लागून गेलीये, त्यामुळे "मसान"मध्ये
वडील-मुलगा/वडील-मुलगी यामधील नातं बघणं खूप वेगळा, चांगला
आणि आश्वासक अनुभव आहे.
चित्रपटाचा शेवट तर अप्रतिमच ! कस्तुरीच्या शोधासारखं ती
दोघं भटकत असतात. जणू एकत्र येण्यासाठीच.आणि शेवटी गंगेच्या तीरावरच्या या दोन
गोष्टी,
दीपक आणि देवी, संगमावरच एकमेकांना भेटतात. पाण्यामधून
ती होडी हळूहळू जाते. तो पाण्याचा आवाज, मागे वाजणारं गाणं,
होडीचे पाण्यावर उठणारे तरंग. दोन मनांच्या आयुष्यांच्या संगमात एका
आश्वासक उद्याची आशा अस्पष्टपणे जाणवते मसान मधून. प्राप्त परिस्थितीवर मात करून,
तिच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जायलाच हवं, ह्याचं
भान देवी आणि दीपक देऊन गेले. 'आयुष्य' आपल्याला जिथे नेतं, तिथे आपल्याला जावंच लागतं.
त्या त्या ठिकाणी जाणं आणि तिथलंच होणं, हे जमवण्याची
ज्याच्यात हिंमत असते, तो हा अनिश्चित प्रवाससुद्धा एक सोहळा
बनवू शकतो.
"मसान" ची जादू या अशा लहान लहान गोष्टींमध्ये आहे. जिथे जीवनाचा शेवट
होतो तिथे त्यांच्या जगण्याचा प्रारंभ होतो म्हणजे मसान. जन्म आणि मृत्यू
यांच्यामध्ये असलेलं आयुष्य साजरं करायला विसरू नका’ अशी
टॅगलाइन देऊन गेला 'मसान'. मृत्यू ही
एक सुरुवात असते. मागे राहिलेल्यांसाठी एकाच जन्मातली दुसरी आणि निघुन
गेलेल्यासाठी नव्या जन्माची. सुरेश भट साहेबांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
'तू किसी रेलसी गुजरती है, मैं किसी पूलसा थरथराता हू'
या मानवी भावना व्यक्त करणाऱ्या हिंदी कवी दुष्यंत कुमार यांच्या
ओळी अन 'मसान'ची ओळख झाली आहे
आयुष्यभराकरता.....
गणेशदादा शितोळे
०६ ऑगस्ट २०१८
मसान ची जादू….
खूप दिवसानंतर आज कुठला चित्रपट पाहिला. अनेक दिवसांपासून
मित्राने चांगला चित्रपट आहे म्हणून सांगून ठेवलेल्या मसान ची जादू आज अनुभवली.
अगदी साधा अन सामान्य वाटणारा असाच. कुठलीही भव्यता, मारझोड शिवाय
साकारलेला एक चांगला चित्रपट सर्वांत उंचावर आणि सर्वांत तळाशी समजल्या जाणार्या
या ‘तरूण भारता’चा आपापल्या आयुष्याशी
चाललेला संघर्ष ‘मसान’ अतिशय
संवेदनशीलतेने आपल्याला दाखवतो. मसान जरी गंभीर प्रकारचा चित्रपट असला तरी फ्रेश
आहे. काहीतरी नवी, भावजाणिवा समृद्ध करणारी कलाकृती
पाहिल्याचं समाधान देणारा आहे. मसान’ ही तुमच्याआमच्या
आजच्या आधुनिक पण सर्वसामान्य आयुष्यात कधीही येऊ शकणार्या दु:खाची वास्तववादी
कहाणी आहे.
चित्रपटाचा शेवट एक अंधुक आशा सोडून जातो पण स्पष्ट काही
सांगत नाही. त्यामुळे ती एक शोकात्मिका असली तरी शोकांतिका नाही. 'मसान'
हा काही पॉप्युलर सिनेमा नाही. त्यात आजचे आघाडीचे समजले गेलेले
कलावंत नाहीत. त्यात मुळात फारशी गाणी नाहीत आणि लोकप्रिय होतील अशी तर नाहीच
नाही. तरीही एकदा चित्रपट सुरू झाला की, तो जबरदस्त वेगानं
आपल्याला मूळ कथावस्तूकडे खेचून घेतो इतकी विलक्षण ताकद त्याच्यात आहे. मसान
पाहिल्यावक एक जबरदस्त अनुभव आपल्यावर कोसळतो आणि त्यामुळे आपण अधिकच अंतर्मुख
होतो.
काही चित्रपट कळण्यास कठीण असतात म्हणून नव्हे तर त्या
चित्रपटात बुडी मारल्यावर समोर जे काही दिसतंय- त्यातून जे जाणवतंय- ते शब्दांत
नेमकं पकडणे अधिकच त्रासाचं असतं. या चित्रपटातील चित्र बोलतात, दृश्य
बोलतात, संवाद बोलले जातात, अतिशय
हृद्य कथा असते, एकूण चित्रपटही काही ठाम विधान करतो पण
एखाद्या डोंगरावर फिरताना भोवतालच्या ढगांतून चालावं, नी
हळूहळू पूर्ण चिंब व्हावं पण नक्की कसे नी कधी भिजलो हे शब्दांत सांगता येऊ नये
तशी आज माझी स्थिती 'मसान' हा चित्रपट
बघून झाली आहे. ‘मसान’ हा चित्रपट
भारतीय माणसांवरील संस्कार, संस्कृती, समाज
आणि रूढी-परंपरा यांच्या जोखडातून मुक्त होऊ पाहणाऱ्या तरुण मनांचा हुंकार आहे.
गंगेच्या तीरावरच्या दोन गोष्टी. एक गोष्ट संस्कृत
पंडिताच्या घरातली (देवी) तर दुसरी डोम/खालच्या जातीतल्या घरातला (दीपक). दोन
तीरावरच्या दोन गोष्टी. दोन समांतर चालणारे धागे. आणि यांना जोडणारी दुसऱ्या
गोष्टीतील तो लहान मुलगा यावेळी ती ट्रिक दाखवतो. पहिल्या गोष्टीमधली अंगठी तो
पाण्यातून शोधून काढतो आणि दुसऱ्या गोष्टीतील गरजू बापाला आणून देतो. अप्रत्यक्षपणे
या दोन गोष्ठी जोडल्या जातात. अगदीच साधेपणाने तो प्रसंग खूप मोठा परिणाम करून
जातो.
तू किसी रेल से अप्रतिम गाणं स्वानंद किरकिरेंना साकारलंय.
अजून एक आवडलेली गोष्ट: "मसान" मध्ये "आई" हे पात्र जवळपास
नाही. म्हणजे दोघंही पोरके नाहीयेत अजिबात, पण त्या दोघांचं आपापल्या
वडिलांबरोबरच नातं इतकं सुंदर मांडलंय कि आई या पात्राची गरजंच भासली नाहीये. केवळ
मूख्य पात्रंच नाही तर देवीच्या ऑफिस मधला सहकारी पण सांगतो "हम अकेले नही
रेहते पिताजी के साथ रेहते है". लहानपणापासून चित्रपटात 'आई' या पात्राचे Trump Card वापरलेलं
बघायची सवय लागून गेलीये, त्यामुळे "मसान"मध्ये
वडील-मुलगा/वडील-मुलगी यामधील नातं बघणं खूप वेगळा, चांगला
आणि आश्वासक अनुभव आहे.
चित्रपटाचा शेवट तर अप्रतिमच ! कस्तुरीच्या शोधासारखं ती
दोघं भटकत असतात. जणू एकत्र येण्यासाठीच.आणि शेवटी गंगेच्या तीरावरच्या या दोन
गोष्टी,
दीपक आणि देवी, संगमावरच एकमेकांना भेटतात. पाण्यामधून
ती होडी हळूहळू जाते. तो पाण्याचा आवाज, मागे वाजणारं गाणं,
होडीचे पाण्यावर उठणारे तरंग. दोन मनांच्या आयुष्यांच्या संगमात एका
आश्वासक उद्याची आशा अस्पष्टपणे जाणवते मसान मधून. प्राप्त परिस्थितीवर मात करून,
तिच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जायलाच हवं, ह्याचं
भान देवी आणि दीपक देऊन गेले. 'आयुष्य' आपल्याला जिथे नेतं, तिथे आपल्याला जावंच लागतं.
त्या त्या ठिकाणी जाणं आणि तिथलंच होणं, हे जमवण्याची
ज्याच्यात हिंमत असते, तो हा अनिश्चित प्रवाससुद्धा एक सोहळा
बनवू शकतो.
"मसान" ची जादू या अशा लहान लहान गोष्टींमध्ये आहे. जिथे जीवनाचा शेवट
होतो तिथे त्यांच्या जगण्याचा प्रारंभ होतो म्हणजे मसान. जन्म आणि मृत्यू
यांच्यामध्ये असलेलं आयुष्य साजरं करायला विसरू नका’ अशी
टॅगलाइन देऊन गेला 'मसान'. मृत्यू ही
एक सुरुवात असते. मागे राहिलेल्यांसाठी एकाच जन्मातली दुसरी आणि निघुन
गेलेल्यासाठी नव्या जन्माची. सुरेश भट साहेबांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
'तू किसी रेलसी गुजरती है, मैं किसी पूलसा थरथराता हू'
या मानवी भावना व्यक्त करणाऱ्या हिंदी कवी दुष्यंत कुमार यांच्या
ओळी अन 'मसान'ची ओळख झाली आहे
आयुष्यभराकरता.....
गणेशदादा शितोळे
०६ ऑगस्ट २०१८


