माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, १० जानेवारी, २०१६


आयुष्य अन नातं...

नात्यांचं आयुष्यात असणं नसणं,
पाणी अन माशांसारखं असतं...
नात्याचं पाणी आटलं तर,
आयुष्य माश्यासारखं तडफडतं...

आयुष्य ह्रदय असेल तर,
नातं त्याचा श्वास असतं...
श्वास कोंडला, संपला की,
आयुष्यही संपून जात असतं...

आयुष्य  चंद्रकोर असलं तर,
नातं आंधारी रात्र असतं...
कोणी एक सोबत नसलं तर
दुसऱ्यालाही शोभत नसतं...

नात्याचं दुसरं नावच आयुष्य असतं,
जणू आयुष्याची जीवनगाठच असतं
गाठ तुटली अन सुटली की,
आयुष्य संपल्यासारखंच वाटतं...

गणेशदादा शितोळे
१० जानेवारी २०१६



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा