तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....
आठवणींच्या जगात जायला निघतो...
तेव्हा शब्द येतात मज भेटायला...
लेखणीतून कागदावर उतरायला...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....
बोलायचं असतं खरंतर मनातून खूप काही....
पण ओठ बोलायचं सोडून देतात...
अन शब्द मनातच खोलवर रूतून जातात....
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....
ऐकावी वाटतात कधी गाणी सुमधूर. ..
ताल सुर करतात बेधुंद एकांतात मन...
डोळ्यांत उभे राहतात गाण्यातल्या वर्णनाचे क्षण...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....
कधी सुरू असतो एकट्याने प्रवास बाईकवरून...
रस्ता घेत असतो वळणाहून वळण...
मन मात्र विचारात गुंग होतं एक क्षण...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....
येते कधी जवळच्या माणसाची आठवण दाटून..
आसवे नयनांची जाती साथ सोडून..
जणू मृग विसरतो बरसायचं नभ असून...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....
आठवणींच्या जगात जायला निघतो...
तेव्हा शब्द येतात मज भेटायला...
लेखणीतून कागदावर उतरायला...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....
बोलायचं असतं खरंतर मनातून खूप काही....
पण ओठ बोलायचं सोडून देतात...
अन शब्द मनातच खोलवर रूतून जातात....
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....
ऐकावी वाटतात कधी गाणी सुमधूर. ..
ताल सुर करतात बेधुंद एकांतात मन...
डोळ्यांत उभे राहतात गाण्यातल्या वर्णनाचे क्षण...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....
कधी सुरू असतो एकट्याने प्रवास बाईकवरून...
रस्ता घेत असतो वळणाहून वळण...
मन मात्र विचारात गुंग होतं एक क्षण...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....
येते कधी जवळच्या माणसाची आठवण दाटून..
आसवे नयनांची जाती साथ सोडून..
जणू मृग विसरतो बरसायचं नभ असून...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....
गणेश दादा शितोळे
(२३ जुलै २०१५)
(२३ जुलै २०१५)