माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, २ जून, २०१९

आयुष्याची वाट चालत रहायची...!!!


नव्या या आयुष्याच्या वळणावर,
जुनीच ती पाऊलवाट आहे चालायाची,
अनोळखीच्या पाऊलखुणा शोधत
साथीने तुझ्या ही वाट अशीच चालायाची...

नव्या शब्दांची नव्या भावनांची
ओळख हुळवार तुला मला व्हायाची...
खाचखळग्यातूनही हळूवार
पानापानातून आपली वाट काढायाची...

खळखळत्या नदी नाल्यासोबती
वाट मुक्यानेच सारे समजायाची...
तुझे माझे सारू विसरून
आपली होत एकेक पाऊले टाकायाची...

मी झालो निशब्द तरी
भाषा तू माझीही व्हायाची...
प्रेम, विश्वासाचा कटाक्ष टाकत
अलगद काटा बाजूला करत वाट आपण ही चालायाची...

एखाद्या वळणाला कधी चुकामुक झाली
कधी तू कधी मी एकमेकांसाठी वाट थांबायाची...
वहात्या वाऱ्याने आण दिली कवितेला की तू
मला कविता म्हणून वाटेवरती भेटायची

दिवस सरले, कागदाची पानं बदललं तरी
आयुष्याची वाट आपण चालत राहायची...
हाती हात देऊन महिना झाले तरी,
आपण अशी वर्षे सोबतीने जगायाची....

गणेश सुवर्णा तुकाराम
(२ जून २०१९)






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा