इथला भारतीय अजूनही गुलामगगिरीत आहे...
थाठतो
इथं भोंदू पसारा स्वत:ला देवाचा अवतार सांगून,
लोकांच्या
श्रद्धेच्या नावाखाली गंडवण्याचा प्रयत्न जोरदार होतोय...
असतात
आमचे दैववादी श्रद्धेचे विचार म्हणून,
मांडून
श्रद्धेचा बाजार आम्ही माणसं माणसांनाच फसवतोय...
आपण
कितीही म्हणालो भारत स्वतंत्र झाला तरी,
भारतीय
अजूनही भोंदू दैववादाचा गुलाम आहे...
असतो
इथं कोणी एक जीवांचं राजकारण करायचं म्हणून,
जातीधर्माचा
आधार घेत स्वत:ची राजकीय पोळी भाजतोय...
असतात
आमचे राजकीय मतभेद म्हणून,
घेऊन
हाती शस्त्र आम्ही माणसं माणसांनाच संपवतोय...
आपण
कितीही म्हणालो भारत स्वतंत्र झाला तरी,
भारतीय
अजूनही राजकीय हिंसेचा गुलाम आहे...
उठतो
इथं धर्मवेडा धर्मरक्षणाचा हेतू म्हणून,
लोकांची
माथी भडकवण्याचा प्रयत्न जोरदार होतोय...
असतात
आमचे धार्मिक मतभेद म्हणून,
घेऊन
हाती शस्त्र आम्ही माणसं माणसांनाच संपवतोय...
आपण
कितीही म्हणालो भारत स्वतंत्र झाला तरी,
भारतीय
अजूनही धार्मिक हिंसेचा गुलाम आहे...
मारले
इथं कोणी गांधी,
पानसरे, दाभोळकर म्हणून,
संपला
नाही त्यांचा विचार, तो अजून फोफावतोय...
असतात
आमचे वैचारिक मतभेद म्हणून,
घेऊन
हाती शस्त्र आम्ही माणसं माणसांनाच संपवतोय...
आपण
कितीही म्हणालो भारत स्वतंत्र झाला तरी,
भारतीय
अजूनही वैचारिक हिंसेचा गुलाम आहे...
धर्मनिरपेक्षतेचा
विचार संपत चालला आहे म्हणून,
माणसातला
धार्मिक द्वेष वाढत चाललाय....
प्रत्येकाला
वाटतो इथं वैर दुसऱ्याशी,
माणूस
माणूसकीच्या नात्याला विसरत चाललाय...
म्हणून
आपण कितीही म्हणालो भारत स्वतंत्र झाला तरी,
इथला
भारतीय अजूनही गुलामगगिरीत आहे...
गणेशदादा शितोळे
(७ डिसेंबर २०१७)