माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६


भारताचा राष्ट्र ध्वज तिरंगा होता, आहे आणि रहाणार....










भारताचा राष्ट्र ध्वज तिरंगा होता आहे आणि रहाणार....
तसाच भारत हा धर्म निरपेक्ष होता आहे आणि रहाणार...
बाकी कुणी कितीही धार्मिक द्वेषाचे राजकारण केले तरी हे बदलणार नाही.शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला त्याच्या नंतर त्याचीच कबरही डौलाने बांधली. कारण माणूस संपला की वैर संपते...आणि वैर माणसाशी नसते विचारसरणीशी असते...शिवाजी महाराजांनी कधीही मुसलमान द्वेषापोटी स्वराज्य स्थापन केले नाही. ना कोणाचा घरवापसी धर्मांतर घडवून आणले...नाहीतर मग औरंगाजेबात आणि त्यांच्या मधे काय फरक उरला असता...शिवाजी महाराजांचे विचार समजले तर त्यांना आदर्श माणने योग्य आहे. नाहीतर त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन मिरवण्यापुरते आदर्श मानणे ही एक प्रकारची बदनामीच आहे...


 गणेशदादा शितोळे
(१५ ऑगस्ट २०१६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा