माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, १२ मार्च, २०१३


आठवणीत आहे तू मी अन अविस्मरणीय केरळ....









आठवता आहे सोबत घालवलेला कोझिकोडे मधला वेळ. ..
सोबत खाल्लेली मराठमोळी पानीपुरी अन भेळ...
आयुष्यात पहिल्यांदा जुळला होता नात्यामधला मेळ...
आठवणीत कायम आहे तू मी अन अविस्मरणीय केरळ....


आठवतोय तो अथांग निळाशार समुद्र. ..
गप्पांच्या क्षणात रंगून गेलेला चौपाटीवरचा पावलांचा प्रवास
अन सोबत घालवलेली ती रम्य संध्याकाळ....
आठवणीत कायम आहे तू मी अन अविस्मरणीय केरळ....


आठवतोय तो कन्याकुमारीतला
रंगाची उधळण करीत मावळणार्‍या सूर्याचा खेळ...
होती ती एक तीन सागरांच्या मिलनाची सांजवेळ...
लक्षात राहीला तोही एकत्र घालवलेला वेळ....
आठवणीत कायम आहे तू मी अन अविस्मरणीय केरळ....


गणेश दादा शितोळे
(१२ मार्च २०१३)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा