माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, १५ जुलै, २०१७

भावनांच यंत्राशी बोलणं...!!!


संगीत जुनंच आहे,
सूर नव्याने जुळतायत....
मनंही काहीस जुनंच,
तेही नवी तार छेडतायत...

एका ओळखीच्या वळणावर,
मित्रमंडळीला नव्याने शोधतायत...
ओघळत्या आसवांनी
जुन्या आठवणींना उजाळा देतायत...

साठलेलं आठवणींच आसू,
सुटलेल्या मूठीसह सुटतायेत...
माणसांशी बोलायच्या भावना,
अलगद यंत्रांशी बोलतायेत...




गणेश दादा शितोळे
(१५ जुलै २०१७)