महाराष्ट्र राज्य युवक कवी संमेलन, अहमदनगर.
स्थळ :- सहकार सभागृह.
दि. २२ फेब्रुवारी २०१४.
मी सादर केलेली पहिली कविता.............
स्थळ :- सहकार सभागृह.
दि. २२ फेब्रुवारी २०१४.
मी सादर केलेली पहिली कविता.............
असं कोणीच उरलं नव्हतं............
आज अचानक असं काही घडलं होतं
कधी असं घडणार वाटलंच नव्हतं
प्रत्येक क्षणाला तुझी आठवण येणं सुरू होतं
पण उचकी लागायचंच बंद झालं होतं....
इनबॉक्सकडं पहात आजही मोबाईल वापरणं तसंच सुरू होतं
प्रत्येक मेसेजला तितक्याच उत्सूकतेनं पाहिलं जात होतं
फॉरवर्ड मेसेलाही आता मनापासून वाचावं लागत होतं
मनापासून मेसेज करणारं आता कोणीचं राहिलं नव्हतं....
प्रत्येक मिसकॉललाही अटेंड करायला आजही आवडत होतं
पण मिसकॉल देणारंच आता कोणी राहिलं नव्हतं
कामापुरता मला फोन करायला प्रत्येकालाच आवडत होतं
कामाव्यतिरक्त बोलणारं आता कोणीच उरलं नव्हतं....
आजही प्रत्येकाला मलाच फोन करावा लागत होतं
नेहमी मलाच हाऊ आर यु विचारावं लागत होतं
प्रत्येकवेळी मी कसा आहे मलाच सांगावं लागत होतं
मी कसा आहे विचारणारं आता कोणीच उरलं नव्हतं....
गणेश दादा शितोळे
(२३ फेब्रुवारी २०१४)
(२३ फेब्रुवारी २०१४)